HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी, कॉंग्रेसला सोडचिठ्ठी ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- राष्ट्रवादी कॉँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडीतून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीतील मतदान यासाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीकडे पाठ फिरवून राष्ट्रवादीने वेगळे होण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी युपीएमधून बाहेर पडल्यास भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता असून याचे राज्याच्या राजकारणात पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

गुराज्यातमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे. परंतु राष्ट्रवादीने समन्वय ठेवत दोन्ही उमेदवाराला एक-एक मत दिल्याचा दावा केला आहे. कॉँग्रेस मात्र यावर विश्वास ठेवत नाही. राष्ट्रवादी कॉग्रेससोबत राहून हवी ती कामे करून घेत आहे. परंतु ऐनवेळी दगाफटका करत असल्याचे कॉँग्रेसमधील दिग्गजांचे म्हणणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर कॉँग्रेस नेते नाराज आहेत. दरम्यान, कॉँग्रेसचे आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. उलट अशा आरोपांमुले दुखवाल्याचे सांगत राष्ट्रवादीने शुक्रवारी कॉँग्रेसने बोलावलेल्या बैठकीकडे पाठ फिरवली.

कॉँग्रेस-राष्ट्रवादीतील वादाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना-भाजपला अडचणीत आणण्यासाठी दोन्ही कॉँग्रेसचे वारंवार मनोमिलन होत असताना राष्ट्रवादीचे प्रमुख मात्र दिल्लीत कॉँग्रेससोबत काडीमोड करण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे याचा फायदा भाजप सेनेला होणार हे निश्चित. दरम्यान, राष्ट्रवादीने जर भाजपची सोबत केली तर मात्र राज्याच्या राजकारणात वेगळे चित्र असेल. शिवसेनेला पर्याय म्हणून राष्ट्रवादी महत्वपूर्ण भूमिका निभावू शकते. कॉँग्रेससोबत शिवसेनेवर मात करण्यासाठी भाजपची मोठी खेळी यातून यशस्वी होवू शकते. त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, हे निश्चित…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Russia-Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट

Manasi Devkar

केवळ लष्करालाच नव्हे तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करु !

News Desk

श्रीलंकेत सुरक्षा दलाची कारवाई, ३ दहशतवाद्यांसह १५ जणांचा खात्मा

News Desk