HW News Marathi
देश / विदेश

नीरव मोदीला लवकरच अटक होण्याची शक्यता

नवी दिल्ली | हिरा व्यापारी नीरव मोदींनी पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात फरार झाला आहे. मोदी ब्रिटनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती ब्रिटीश अधिकाऱ्यांनी दिली होती. यानंतर सीबीआयने नीरव मोदीला प्रत्यार्पणासाठी ब्रिटनकडे मागणी केली आहे. गेल्या काही दिवसापासून सीबीआय नीरव मोदीच्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहेत. गेल्या जुलै महिन्यात नीरव मोदी विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली होते.

नीरव मोदीला डायमंड किंग म्हणून ओळखला जातो. नीरवने पंजाब नॅशनल बँकेला ११,५०० कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. मित्राच्या मदतीने बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप नीरववर आहे. फोर्ब्जच्या या जगातील श्रीमंतांच्या यादीत मोदी ८४ व्या स्थानी होता. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची २५ स्टोअर्स आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्याच्या सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

Aprna

पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार, जवान शहीद

Gauri Tilekar

सिरीयात पुन्हा रासायनिक हल्ला

News Desk
महाराष्ट्र

मुंबईत अटलजींचे स्मारक उभारण्याचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

मुंबई | माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजयेपी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. अटलबिहारी वाजयेपी यांचं १६ ऑगस्टला निधन झालं होतं. १७ ऑगस्टला अटलजींवर दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

मुंबईत झालेल्या शोकसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांना साजेसं योग्य स्मारक मुंबईत उभारण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार अमर आहेत. त्यांनी दिलेल्या देशसेवेच्या, देशप्रेमाच्या मार्गाने चालणे ही त्यांना खरी श्रद्धांजली असेल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनातीन अनेक महत्त्वाचे किस्से यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना सांगितले. अटलजींच्या अस्थींची कलश यात्रा अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींची कलश यात्रा देशातील सर्व राज्यात काढण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांकडे अस्थी कलश सोपवला आहे. दिल्लीच्या भाजप कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह उपस्थित होते. विविध राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष वाजपेयींचे अस्थी कलश घेऊन जातील. त्यानंतर राज्यातील तालुक्यात अटल कलश यात्रा आणि शोक सभेचं आयोजन केलं जाणार आहे. अस्थींना वेगवेगळ्या नद्यांमध्ये प्रवाहित केलं जाईल.

Related posts

पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

News Desk

अमरावती हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

News Desk

राज्यातील ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका होणार, गृहमंत्र्यांचा निर्णय

News Desk