HW News Marathi
देश / विदेश

नोटबंदी एक अविचारी निर्णय | रघुराम राजन

भाजप सरकारच्या काळात घेण्यात आलेला नोंटबंदीचा निर्णय हा एक अविचारी निर्णय असल्याचे मत रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम यांनी व्यक्त केले आहे. केंब्रिजस्थित प्रतिष्ठित हार्वर्ड केनेडी स्कूल येथे बुधवारी एका व्याख्यानात ते बोलत होते.

निश्चलनीकरण ही एक चांगली कल्पना नाही असे आपण सरकारला स्पष्टपणे सांगितले होते. ८७.५ टक्के चलनी नोटा बाद ठरविणाऱ्या या प्रक्रियेची अंमलबजावणी नियोजनाविनाच केली गेली. त्यामुळे तो एक अविचारी निर्णय आणि निष्फळ उपक्रम ठरल्याची टीका रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम यांनी पुन्हा एकदा येथे केली.

चलनी ८७.५ टक्के नोटा रद्द ठरविणे हा अविचार होता असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी वस्तू आणि सेवा कराबाबत आपण अद्याप आशा सोडलेली नाही परंतु ही दुरुस्त न करता येणारी समस्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजन म्हणाले, ‘माझ्याकडे सरकारन चर्चेला आले नाही असे मी म्हणणार नाही. परंतु हा प्रस्ताव जेव्हा पहिल्यांदा माझ्यापुढे आला तेव्हाच ही एक चांगली कल्पना नाही असे स्पष्टपणे सांगितले होते.’ असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्रात भाजपला जबरदस्त धक्का, शिरोमणी अकाली दलचा NDAतून काढता पाय

News Desk

गंगेचे पावित्र्य राखण्यासाठी कठोर नियम

News Desk

राज्यातील आयुर्वेदीक डॉक्टर्सही घेणार ‘कोरोना’ उपचारासंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण

News Desk
मुंबई

शेतकऱ्यांचा संताप, मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर फेकला भाजीपाला

News Desk

मुंबई | शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीस कुठलेही बंधन नसताना मुंबई महापालिकेचे अधिकारी शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांकडून लाच मागत असल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील शेतकऱ्यांनी शेतीमाल मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर फेकून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल घेऊन बोरीवली किंवा वाशीच्या मार्केटमध्ये येतात. येथे बिहारी किंवा उत्तर प्रदेशमधील विक्रेत्यांना भाजीपाला विक्रीसाठी महापालिका परवानगी देते. परंतु स्थानिक किंवा महाराष्ट्रीय विक्रेत्यांकडून प्रत्येक एक हजारांची लाच मागते.

याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आपला कृषीमाल मंत्रालाच्या प्रवेशद्वारावर फेकून दिला. या प्रकाराने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षेसाठी उभे असलेल्या पोलिसांची त्रेधा तिरपट उडाली. नेमके काय झाले, याचा शोध घेण्याता पोलिसांचीही धावपळ उडाली. सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related posts

कौशल्य प्रशिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी दर २ महिन्यांनी संस्थांचा जनता दरबार! – मंगलप्रभात लोढा

Aprna

 पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी

swarit

अक्षय कुमारची महापालिकेला ३ कोटींची मदत, मास्क, पीपीई किट्सही पुरवणार

News Desk