HW News Marathi
देश / विदेश

आता ४० लाख टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना जीएसटी भरावा लागणार नाही !

नवी दिल्ली | जीएसटी कौन्सिलच्या आज (१० जानेवारी) झालेल्या बैठकीत उद्योजकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या कंपन्यांचा टर्नओव्हर ४० लाख असेल त्या कंपन्यांना जीएसटी लागू होणार नसल्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलच्या २२ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या बैठकीत ज्या उत्पादनांवर २८% जीएसटी लागू होता अशी ७ उत्पादने १८% जीएसटी लागू असणाऱ्या उत्पादनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती. या व्यतिरिक्त अन्य ४० उत्पादनांवरील जीएसटीच्या दरांमध्ये कपात करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेसला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम, राऊतांचा काँग्रेसशी ‘सामना’!

News Desk

इस्रोकडून ‘आरआयसॅट-२ बी’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk

“आपण पुन्हा लग्न करुयात आणि सत्तांतर करुयात..”, मोदी-ठाकरे भेटीवर उदयनराजेंची प्रतिक्रिया

News Desk