HW News Marathi
देश / विदेश

तिन्ही सेनादल प्रमुखांची पत्रकार परिषद सायंकाळी ७ वाजता होणार

नवी दिल्ली | भारताचे फायटर पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान उद्या (१मार्च) भारतात परतणार आहे. यासंदर्भातील माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. “शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या (१ मार्च) सुटका करणार आहोत,” असे इम्रान यांनी पाकिस्तानच्या संसदेत म्हणाले आहे. पाकिस्तानच्या या निर्णयानंतर आज (२८ फेब्रुवारी) सैन्य दल, वायुसेना आणि नौदल या तिन्ही दलाची संयुक्त पत्रकार परिषद सायंकाळी ७ वाजता दिल्लीत होणार आहे. या पत्रकार परिषदेकडे दोन्ही देशाचे लक्ष लागले आहे.

या तिन्ही दलाची पत्रकार परिषद आधी सायंकाळी ५ वाजता होणार होती. पाकिस्तान विंग कमांडर अभिनंदनला सोडणार असल्याची माहिती मिळाताच या पत्रकार परिषदेच्या वेळेत बदल करून सायंकाळी ७ वाजताची करण्यात आली. तिन्ही दलाचे प्रमुख या पत्रकार परिषदेत नेमके काय बोलणार यांची उत्सुकता सर्वांच लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#Coronavirus : चेन्नईतील न्यूज चॅनलच्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

News Desk

आयसीएसई बोर्डाकडून दहावी-बारावीचा निकाल आज होणार जाहीर

News Desk

जाणून घ्या…याआधी कधी भारतीय लष्करावर झाले दहशतवादी हल्ले

News Desk