HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमधील चकमकीत १ दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर | पुलवामावमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबादारी जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनाने स्वीकारलेली आहे. भारतीय लष्कराने आज (२२ फेब्रुवारी) काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरे येथे दहशतवाद्यांवर कारवाई सुरू केली आहे. या भागात जवळपास २ ते ३ दहशतवादी लपून बसले असून या परिसराला घेराव घालण्यात आला आहे. हे दहशतवादी जवानांवर गोळीबार करण्यात येत असून भारतीय लष्ककराकडून याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. या चकमकीदरम्यान १ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

भारतीय लष्कराला सोपोर परिसरात दहशवादी लपल्याची माहिती मिळाली. यांची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर सैन्याने संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. सुरक्षा दलांनी घेरल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दहशतवादी आणि भारतीय लष्करातमध्ये अद्याप चकमक सुरूच आहे. सोमवारी (१८ फेब्रुवारी) झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यावेळी चकमकीत एका मेजरसह चार भारतीय जवान शहीद झाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे!”

News Desk

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचा मृत्यू?, ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

Aprna

भारताच्या कमलप्रीत कौरचा थाळीफेक अंतिम फेरीत प्रवेश!

News Desk