HW News Marathi
देश / विदेश

पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ होणार ?

पूनम कुलकर्णी | विविध मार्गांनी दहशतवाद पोसून भारताच्या सातत्याने कुरापती काढणा-या भारतात आतंकवाद घाडविणा-या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी पुन्हा एकदा २९ सप्टेंबर २०१६ सारखा सर्जिकल स्ट्राइक करण्याची वेळ तर आली नाही ना ? अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली पहायला मिळत आहे.

कारण पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान भारताबरोबर संवाद सुरु करण्यासाठी पत्र लिहीतात तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य भारतीय शहिद जवान नरेंद्र सिंह यांच्या मृतदेहाची विटंबन करते. यावरुन इम्रान खान हे देखील आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर यांच्या हातातली कटपुतली झाल्याचे दिसून येत आहे.

२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानने व्यापलेल्या कश्मीरमध्ये आतंकवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राइक केले होते. या घटनेला २९ सप्टेंबर २०१८ रोजी २ वर्षे पुर्ण होत आहेत. या ऑपरेशनचे ध्येय आतंकवाद्यांचे अनेक मनसुबे मोडीत काढणे (नष्ट करणे ) असे होते. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी आतंकवाद्यांविरोधात दोन हात केले होते. या सर्जिक स्ट्राइक विषयी माहिती मिळताच देशातल्या प्रत्येकाला याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. अलिकडे या सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडीओ देखील पहायला मिळाला. या व्हिडीओ मध्ये पहायला मिळाले कसे भारतीय जवानांनी पाकिस्तान मधील आतंकवाद्यांना त्यांच्याच परीसरात घुसून उद्धस्त केले.

सप्टेंबर २०१६ ला भारतीय लष्कराच्या उरी येथील कॅम्पवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिवसेंदिवस सरकारवर दबाव वाढत होता. परंतु त्यानंतर अवघ्या १२ दिवसात देशवासीयांना आनंदाची बातमी मिळाली. इशारा स्पष्ट होता की यापुढे पाकिस्तानच्या कारनाम्यांचे उत्तर पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या घरात घूसुन दिले जाणार होते. या सर्जिकल स्ट्राइकचा मुख्य उद्देश हाच होता की पाकिस्तानने आतंकवाद्यांना साथ देणे बंद करावे आणि फोफावत असलेल्या पाक विरुद्ध भारत या आतंकवादी हल्ल्यांना आळा बसावा. परंतु आज २ वर्षानंतर देखील पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत.

या सर्जिकल स्ट्राइक नंतर पाकिस्तान दिवसेंदिवस भारताला उद्धस्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचा स्पष्ट इशारा कश्मीरमध्ये वाढत असलेल्या आतंकवादी घटनांकडे पाहून मिळतोय. एकिकडे भारतीय लष्कर देशातील आतंकवाद नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे आतंकवाद्यांची नवीन गॅंग रातोरात तयार होत आहे.

पाकिस्तानमध्ये सक्रीय असलेल्या आतंकवादी संघटना देशातील तरुणांना आतंकवादी म्हणून सक्रीय करण्यात मग्न आहेत. त्यामुळे देशातील तरुण सध्या आतंकवादाच्या मार्गावर चालताना दिसून येत आहेत. भारताविरोधात पाकिस्तानच्या तरुणांना भडकवून त्यांना भारतात पाठविले जात आहे. पाकिस्तानमधील संघटनादेखील भारताविरोधात या फोफावत असलेल्या या दहशदवाला खतपाणी घालत आहेत. पाकिस्तानकडून होणारे हे आतंकवादी हल्ले भारतासाठी नवीन नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान हे अशाच प्रकारचे राजकारण करताना पहायला मिळते.

पाकिस्तानच्या या नेहमीच्या घटनांमध्ये नवीन मात्र एकच आहे ते म्हणजे पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या हालचाली. पाकिस्तानच्या नीचपणाचा कळस जगाच्या पटलावर प्रत्येक देशाला परीचित आहे. परंतु पाकिस्तान देशात असलेली गरीब आणि बेरोजगारीकडे लक्ष न देता भारतात आतंकवाद पसरविण्यात मग्न आहे. अमेरीकेच्या जिवावर पाकिस्तानने भारतात आतंकवादी पसरविण्याची फॅक्टरी खोलली होती परंतु ती सुद्धा येत्या काळात बंद होण्याच्या मार्गावर आहे. अमेरीकेने देखील म्हटले आहे आतंकवादी निर्माण करणारे कुणाचेच नसतात.

आतंकवादाला आपला धर्म मानत असेलेला पाकिस्तान शब्दांनी समजून घेत नाही. जगाच्या पटलावर पाकिस्तानला समजून सांगेल अशी जबाबदारी देखील कोणता देश घेणार नाही. त्यामुळे प्रश्न आपला आहे तो सोडविण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी लष्कराने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक सारखे कठोर पाउल उचलावे लागले असे वातावर पुन्हा एकदा निर्माण झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुका असलेल्या राज्यात केंद्राने खतांचा साठा वळवला; दादासाहेब भुसेंचा केंद्रावर आरोप

Aprna

कंगना रणौतने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, अभिनेत्री आता या प्रकल्पाची असणार ब्रँड अ‍ॅम्बेसिडर!

News Desk

नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्याविरोधात पुकारले बंड

News Desk