HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान झाले शांतिदूत

नवी दिल्ली | पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्‍तानमधील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांवर शांततेसाठी चर्चा सुरु करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्याचप्रमाणे इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या बैठकीसाठी संयुक्त राष्ट्रांकडे विनंती केल्‍याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

न्यूयॉर्कमध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण बैठकीत सुषमा स्वराज आणि कुरेशी यांची भेट घ्यावी यासाठी इम्रान खान प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसत आहे. इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांकडे ‘ही बैठक व्हावी’, अशी मागणी केल्याचे समजते आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी दहशतवाद, काश्मीर प्रश्न असे गुंतागुंतीचे प्रश्न चर्चेने सोडविले पाहिजेत अशी विनंती इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पत्रातून केली आहे.

याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहिले होते. या पत्रात दोन्ही देशांनी शांततेसाठी चर्चा करण्याची तयारी दाखविली होती. ‘दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकले तर आम्‍ही दोन पावले पुढे टाकू’, इम्रान खान यांनीही आपल्या निवडणुकीसाठीच्या प्रचारावेळी म्‍हटले होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रेल्वेने ३९२ ‘फेस्टिव्हल विशेष गाड्या’ चालवण्याचा घेतला निर्णय

News Desk

दिल्लीच्या औरंगजेब रोडवर स्फोट,बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

News Desk

मोदी सरकारने कृषी कायद्याला २ वर्षे नव्हे कायमची स्थगिती द्यावी !

News Desk
देश / विदेश

देशातील इंधन दरवाढीला लगाम बसण्याची चिन्हे नाहीच

Gauri Tilekar

नवी दिल्ली | देशातील इंधन दरवाढीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. काल (बुधवारी) एका दिवसाच्या विश्रांती नंतर आज (गुरुवारी) २४ व्या दिवशी पुन्हा पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबईतील आजची पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८९.६० तर डिझेलची किंमत प्रति लिटर ७८.४२ एवढी झाली आहे. मुंबईत आज (गुरुवारी) पेट्रोल ७ पैशांनी महागले आहे. देशातील या इंधन दरवाढीला लगाम बसण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत.

दरम्यान, देशातील इतर बऱ्याच राज्यात अनेक ठिकाणी इंधनाच्या किंमतींनी नव्वदी पार केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया दिवसेंदिवस घसरत चालल्याने तसेच कच्च्या तेलाचे भाव कडाडल्याने देशातील इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. केंद्र सरकारने इंधनाला देखील जीएसटीमध्ये समाविष्ट का केले नाही अशी विचारणा काँग्रेसकडून सतत केली जात आहे. तसेच इंधनावर मोठ्या प्रमाणात अधिभार लावल्याने इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळात वाढत असलेल्या महागाई विरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी १० सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. देशभऱातली २१ पक्षांनी या बंदला पाठिंबा देत आपला सहभाग आणि समर्थन दर्शविले होते. परंतु, याचा कोणताही परिणाम इंधन दरवाढीवर झालेला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

Related posts

काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होणार 

News Desk

कुत्र्याऐवजी महिलेलाच काढले विमानाबाहेर

News Desk

कपडे बदलताय, जरा सावधान, छुप्या कॅमेरांची असते तुमच्यावर नजर

News Desk