HW News Marathi
देश / विदेश

कांदा निर्यातबंदी हटवा, केंद्र सरकारला फलोत्पादन मंत्र्यांचे पत्र!

मुंबई | केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. देशभरातून शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला. दरम्यान, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी तातडीने हटविण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेद्रसिंग तोमर यांना पत्र पाठवले आहे.

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा निर्यात बंदी तातडीने हटवावी यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे. केंद्राने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी रोहयो व फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारला ‘ऑपरेशन लोटस’चा धोका

News Desk

उत्तर भारतात ४१ पूरबळी!

News Desk

त्रिपुरामधील कम्युनिस्टांचे सरकार उलथवून टाका | रामदास आठवले

News Desk