HW News Marathi
देश / विदेश

२६/११ हल्ल्यात पाकचा हात, लष्कराने बोलवली बैठक

लाहोर | मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली होती. या वक्तव्याने सर्वत्र खळबळ माजली होती. पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय असल्याचे शरीफ यांनी एका मुलाखतीत मान्य केले होते.

नवाज शरीफ यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाज शरीफ यांच्या वक्तव्याची भारतीय माध्यमांनी चुकीची व्याख्या केली. कुठल्याही तथ्याची पडताळणी न करता पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावरील एका वर्गाने या विधानाला पुष्टी दिली. ज्यामुळे भारतीय माध्यमांना हा विषय वाढवण्यास बळ मिळाले.

एका बाजूला आम्ही दहशतवाद्यांना आसरा देत नाही, असा दावा कायम पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केला जातो. तर दुसऱ्या बाजूला खुद्द माजी पंतप्रधान मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुली दिली जाते.

नवाज शरीफ यांच्या वक्तव्याने पाकिस्तानच्या लष्करात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी लष्कराने यासंदर्भात तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. लष्कर प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे, पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक बोलावण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, लष्काराने ही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीबीआय प्रकरणी ट्विट केल्यामुळे प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

News Desk

वायुसेनेच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा वैमानिक शहीद

News Desk

#Amritsar : रावणाची भूमिका साकारणाऱ्याचाही दुर्दैवी मृत्यू

Gauri Tilekar