HW News Marathi
देश / विदेश

दहशतवादावर चर्चा करण्यास आम्ही तयार | इम्रान खान

इस्लामाबाद | पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरीपएफच्या जवाना शहीद झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेन्याने काल (२६ फेब्रुवारी) पाकव्याप्त काश्मीर एअर सर्जिकल स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त करण्यात आली. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान घाबरले असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (२७ फेब्रुवारी) एक पाऊल मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेसाठी तयार असल्याचे म्हणाले आहे.

भारताने केलेल्या या हल्ल्यात पाकिस्तानचे अनेक जण जखमी झाले तर अनेकांनी आपले प्राण गमविले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांना पाहण्यासाठी रुग्णालयात जावून त्यांची भेट घेत.ली यानंतर मला असे वाटते की, “युद्ध हे कोणत्याही समस्येवर उपाय असू शकत नाही. भारत आणि पाकिस्तान दोघेही देश शस्त्रसज्ज आहेत. “एकदा युद्ध झाले तर माझ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या हातात नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे तुम्ही दहशतवादावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत,” असे इम्रान म्हणाले आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी वायू दलाच्या घुसखोरी केल्याची अधिकृत माहिती दिली आहे. “भारतीय वायू दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले मात्र वायू दलाचे एक विमान अद्याप परतले नसून भारतीय दलाचा एक पायलट देखील परतलेला नाही”, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी यावेळी दिली आहे. अखेर पाकिस्ताने भारतीय वायुदलाचे पायलट आमच्याकडे असल्याची कबुली दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेणबत्ती फुंकून वाढदिवस साजरा करणे आरोग्याला घातक

News Desk

‘सेलिब्रिटीजची चौकशी करा’ असे माझे आदेश नव्हते ! | गृहमंत्री अनिल देशमुख

News Desk

कठुआ बलात्कार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk