HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानने भारतावर केला शस्त्रसंधी उल्लंघनाचा आरोप

नवी दिल्ली | भारतीय लष्कराकडून नियंत्रण रेषेवर (एलओसी) शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करीत पाकिस्तानने मंगळवारी (१ जानेवारी) भारताच्या उच्च कार्यकारी आयुक्तांना समंस बजावले आहे. भारतीय लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या “अघोषित गोळीबाराचा” पाकिस्तानकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय सैन्याने केलेल्या या गोळीबारात एका पाकिस्तानी महिलेचा मृत्यू झाल्याचे देखील पाकिस्तानकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते (दक्षिण एशिया व सार्क) मोहम्मद फैजल यांनी भारतीय राजदूतांना समंस बजावून भारतीय सैन्याने ३१ डिसेंबर रोजी एलओसीवर केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची निंदा केली असल्याचे परराष्ट्र कार्यालयाच्या (एफओ) एका अहवालात म्हणण्यात आले आहे. एलओसीच्या शाहकोट क्षेत्रातील गोळीबारामुळे आशिया बिबी नामक एका पाकिस्तानी महिलेचा मृत्यू झाला असून अन्य ७ जण जखमी झाले आहेत.

“भारतीय सैन्याने २०१८ मध्ये २,३५० हून अधिक वेळा नियंत्रण रेषेवर (एलओसी) शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. परिणामी ३६ नागरिकांचा मृत्यू झाला आणि १४२ जण जखमी झाले”, असा आरोप एफओने केला आहे. मोहम्मद फैजल यांनी भारतीय सैन्याला २००३ च्या ‘सीझफायर करारा’चा आदर करण्याची विनंती केली आहे. त्याचप्रमाणे शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटनांची चौकशी करण्यात यावी या मागणीसह सीमारेषेवरील शांतता कायम ठेवण्याचे आवाहन पाकिस्तानने भारतीय लष्कराला केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्ली व काश्मीर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, राज्यात हाय अ‍ॅलर्ट

News Desk

काश्मीरमध्ये ५ जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

News Desk

ऐतिहासिक निर्णय! सर्वोच्च न्यायालयाच्या घटनपीठाकडून आर्थिक दुर्बल घटकांचे 10 टक्के आरक्षण वैध

Aprna