HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचा १ जवान शहीद तर ४ जखमी

नवी दिल्ली | पुलवामा हल्ल्यानंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय दबावाला समोर जावे लागत असताना देखील पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील राजौरी येथील बट्टल परिसरात पाकिस्तानी सैन्याने सोमवारी (१८ मार्च) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यावेळी झालेल्या गोळीबारात भारताचा १ जवान शहीद झाला असून ४ जवान जखमी आहेत. करमजीत सिंह (२४) असे शहीद जवानाचे नाव आहे.

करमजीत सिंह हे मूळचे पंजाबचे आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी दिवसभरात तब्बल १०० हुनही अधिक वेळा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या गोळीबारात करमजीत सिंह हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नजीकच्या रुग्णालयात अन्य जखमी जवानांवर उपचार सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HatharasCase : पीडितेचा मृत्यू मानेचं हाड मोडल्याने झाला, बलात्काराचा उल्लेख नाही

News Desk

खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या, केंद्र सरकारकडे चंद्रकांत पाटील यांची मागणी

News Desk

भारत- चीनमध्ये युद्धाची शक्यता नाहीच!

News Desk