HW News Marathi
देश / विदेश

राफेल, राम मंदिर, कावेरीवरून संसदेत गदारोळ

नवी दिल्ली | संसदच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी (१२ डिसेंबर) राफेल डील, राम मंदिर उभारणी आणि कावेरी पाणी प्रश्नांवरून विरोधकांनी गोंधळ घातला. यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या तिन्ही मुद्यांवरून काँग्रेस, शिवसेना, टीडीपी आणि एआयएडीएमके पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्या आहेत.

राफेल डीलमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. तर शिवसेनेने अयोध्येत राम मंदिर लवकरणात लवकर उभारावे, अशी मागणी केली.एआयएडीएमकेच्या सदस्यांनी कावेरी नदीतील पाण्याचा प्रश्न उपस्थित करत कावेरी खोऱ्याती शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. टीडीपीने विशाखापट्टणम येथे रेल्वे झोनची मागणी केली. या मुद्यांवरून विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपची १५ राज्यांसाठी नव्या प्रभारींची नियुक्ती; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांकडे मोठी जबाबदारी

Aprna

१८० शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत

News Desk

‘उत्तराखंडाचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचा राजीनामा’

News Desk