HW News Marathi
देश / विदेश

गुन्हेगार लोकप्रतिनिधी अपात्र ठरविण्याची मागणी रद्द | सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | ‘देशाच्या राजकीय नेत्यांवर गंभीर गुन्हे दाखल असेल, तर अशा लोकप्रतिनिधींना आम्ही अपात्र ठरवू शकत नाही. यासाठी संसदेने कायदा करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्तीने राजकारणात येऊन नये’, याची काळजी संसदेने करावी असे देखील त्यांनी म्हटले आहे. यासाठी संसदेने कठोर कायदे करावे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गंभीर गुन्ह्यांचे खटले असल्यास त्यांना निवडणूक लढण्यापासून रोखण्याबाबत याचिकेवर निर्णय देताना म्हटले आहे.

भारतात संसद व विधानसेभेच्या निवडणुकीत खून, बलात्कार आणि अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे खटले असे तर अशा लोकप्रितिनिधीं अपात्र ठरवण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देताना न्यायालायने म्हटले की, सर्व सामान्य जनतेला आपल्या नेत्याची पुर्ण माहिती असायला हवी. प्रत्येक नेत्याने त्याच्या गुन्हेगारी नेत्यानं त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती निवडणूक आयोगाला द्यायला हवी. अशा व्यक्तींनी निवडणूक लढण्यापासून रोखण्याबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

 शशिकला समर्थक ई पलानीस्वामीच तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

News Desk

‘आप’चे २१ आमदार निलंबित होणार ?

News Desk

केंद्र सरकारने नाकारली केरळसाठी यूएईची मदत

Gauri Tilekar
देश / विदेश

विजय माल्ल्याचा ईडीवर धक्कादायक आरोप

Gauri Tilekar

मुंबई | भारतीय बँकांचे तब्बल ९००० हजार कोटी रुपये थकवून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याने आज अंमलबजावणी संचालनालयावर (ईडी) एक धक्कादायक आरोप केला आहे. ‘गेल्या दोन ते तीन वर्षापासून मी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करीत आहे मात्र मी ज्या ज्या वेळी असे प्रयत्न केले; त्या त्या वेळी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मला सहकार्य न करता विरोधच केला, असे माल्ल्याने आपल्या जवाबात म्हटले आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) न्यायालयात सुनावणीवर आपला जवाब नोंदवला आहे. ईडीने ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यातर्गंत’ विजय माल्ल्याला फरार घोषित करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणीवेळी माल्ल्याने आपली बाजू मांडली आहे. तसेच फरार घोषित करण्यासाठी ईडीने केलेल्या याचिकेलाही त्याने विरोध दर्शविला आहे. भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेसाठी मी ब्रिटनमधील प्रशासनाला व्यवस्थित सहकार्य करत असल्याचे त्याने म्हटले आहे.

काहीच दिवसांपूर्वी माल्ल्याने लंडनमधील वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना “परदेशात जाण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती” असे म्हटले होते. दरम्यान अरुण जेटली यांनी हे अमान्य केले होते. त्याचप्रमाणे आमची भेट ही अधिकृत नव्हती असेही त्यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते.

Related posts

पराभवानंतर राहुल गांधींनी अमेठीला दिली पहिल्यांदा भेट

News Desk

एअर स्ट्राईकदरम्यान दहशतवादी तळांवर ३०० मोबाईल अ‍ॅक्टिव्ह, गुप्तचर यंत्रणांची माहिती

News Desk

राम मंदिराच्या भूमिपूजनादिवशी ओविसी यांचे ट्विट, “बाबरी मशिद होती आणि राहील”

News Desk