HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल १९ पैसे तर डिझेल २० पैशांनी स्वस्त

नवी दिल्ली | आज इंधनाच्या किंमतींमध्ये पुन्हा घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात १९ पैसे तर डिझेलच्या दरात २० पैशांनी घट झाली आहे. त्यामुळे आज मुंबई पेट्रोलची प्रतिलिटर किंमत ८२.४२ रुपये तर डिझेलची प्रतिलिटर किंमत ७५.१५ रुपये एवढी झाली आहे. राजधानी दिल्लीतही पेट्रोल १९ पैसे तर डिझेलही १९ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे दिल्लीत आज पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ७६.९१ रुपये तर डिझेलची किंमत ७१.७४ रुपये एवढी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणारी वाढ याचा परिणाम देशातील इंधनाच्या किंमतींवर परिणाम होत असतो. मात्र आता कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. त्यामुळे गेले काही दिवस सलग देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये घट होत आहे. शिवाय, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार मतांचे राजकारण करीत असल्याच्या जोरदार चर्चा रंगात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सोनिया गांधी यांच्यापेक्षा सोनी टीव्ही अधिक समजतूदार !

News Desk

उद्धव ठाकरे विनंती आहे, तुम्ही खुदा होऊ नका !

News Desk

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती खालावली

News Desk
राजकारण

चंद्राबाबू नायडू नंतर ममतानेही सीबीआयला रोखले

News Desk

मुंबई | आंध्र प्रदेशमध्ये यापुढे एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयला बोलावण्यात येणार नाही, असे आंध्र प्रदेश सरकारने स्पष्ट केले असतांना आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुध्दा केंद्र सरकारला जोरदार झटका दिला आहे. यामुळे केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील सीबीआय या तपास यंत्रणेला यापुढे आंध्रातील कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करता येणार नाही वा आंध्र प्रदेशातील पोलीसही सीबीआयच्या तपासात मदत करणार नाहीत.

सीबीआयला राज्यात मुक्त प्रवेशास बंदी करणारा गोपनीय आदेश आंध्र प्रदेश सरकारने ८ नोव्हेंबरला काढला. त्याची माहिती गुरुवारी उघड झाली. यापूर्वी तीन महिने आधीच एका प्रकरणात कारवाई करण्याची परवानगी राज्य सरकारने सीबीआयला दिली होती. मार्च महिन्यात चंद्राबाबू नायडू केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतुन (एनडीए) बाहेर पडले. त्यानंतर, चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयमध्ये सुरू असलेल्या गोंधळावर, केंद्र सरकारने स्वत:च्या फायद्यासाठी सीबीआयची विश्वासार्हता पणाला लावली असल्याची, अशी टीका केली होती. तर आता सीबीआय व इतर सरकारी तपास संस्था मोदी सरकारने स्वतःच्या दावणीला बांधल्या आहेत,अशी टीका ममतांनी केली आहे.

दिल्ली विशेष पोलीस कायद्यातील कलम ५ अन्वये सर्व राज्यात तपास करण्याचा अधिकार सीबीआयला असला तरी त्यातील कलम ६ अन्वये राज्य सरकारच्या संमतीशिवाय सीबीआय त्या राज्यात तपास करू शकत नाही. आंध्र प्रदेश सरकारने त्यामुळे कलम ६ अन्वये सीबीआयला रोखले आहे. त्याच कलमाच्या आधारे ममता बॅनर्जी यांनीही सीबीआयला आपल्या राज्यात कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करू न देण्याचे ठरवले आहे.

Related posts

अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?

News Desk

२०११ पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा !

Gauri Tilekar

उर्मिला मातोंडकर यांनी केला काँग्रेसला राम राम

News Desk