HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधानांकडून हिंसा रोखण्याचे पुन्हा आवाहन

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक रविवारी आकाशवाणीवरून मन की बातमधून जनतेला वेगवेगळे संदेश देतात. परंतु त्याची अंमलबजावणी काही होत नाही. किंबहूना पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशाच्या विपरित त्यांचे भक्त कृती करतात. आता मोदींनी देशात वाढत चाललेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. परंतु त्यांचा संदेश कोण मनावर घेते, हे पुढील काळात दिसून येईलच तुर्त त्यांनी हरियाणातील हिंसाचाराच्या घटनेवर चिंता व्यक्त केली. श्रद्धेच्या नावाखाली हिंसा खपवून घेणार नाही. देश आणि सरकार हिंसा खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राम रहिम यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर तेथे उफाळलेला हिंसाचार, स्वच्छता, क्रीडा, शिक्षण आणि सरकारच्या विविध योजनांवर भाष्य केले. सुरुवातीला मोदींनी हरयाणातील हिंसाचाराच्या घटनेकडे लक्ष वेधले. हिंसाचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त करतानाच त्यांनी हिंसा घडवून आणणाऱ्यांना खडे बोल सुनावले. श्रद्धेच्या नावाखाली हिंसा खपवून घेतली जाणार नाही. देश आणि हे सरकार हिंसा सहन करणार नाही. दोषींना कायदा शिक्षा देणार, असा इशारा त्यांनी दिला. श्रद्धेच्या नावाखाली कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही, असेही ते म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींनी ‘काम की बात’ऐवजी फक्त त्यांच्या‘मन की बात’ केली”, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा मोदींवर टोला

News Desk

देशाची निर्यात वृद्धी होण्यासाठी लॉजिस्टीक खर्च कमी करण्याची आवश्यकता – नितीन गडकरी

News Desk

हिमाचल प्रदेशात दरड कोसळली, ९ पर्यटकांचा मृत्यू

News Desk