HW News Marathi
देश / विदेश

सुरक्षेतील त्रुटीनंतर मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत चूक झाल्याप्रकरणी त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर आज (६ जानेवारी) मोदींनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी त्यांना पंजाबमधील त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा उल्लंघनाची माहिती दिली असून राष्ट्रपतींनीही या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (५ जानेवारी) पंजाब दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला होता. पंजाबमधील सुरक्षेच्या हलगर्जीपणानंतर मोदींनी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली आहे. यावेळी मोदींनी पंजाब दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेतील अडथळ्यांची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यावर असलेल्या सुरक्षा त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान ताफ्याच्या सुरक्षेबाबत सुरु झालेल्या चर्चेनंतर उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनी देखील मोदींना फोन करुन त्यांच्या सुरक्षा त्रुटींबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

काय घडलं पंजाबमध्ये?

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील फिरोजपूरला भेट दिली. मुसळधार पावसामुळे त्यांना रस्तेमार्गे जावं लागलं. दरम्यान, हुसैनीवालापासून ३० किमी अंतरावर आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. त्यामुळे जवळपास पंधरा ते वीस मिनिटं पंतप्रधानांना एकाच ठिकाणी थांबावं लागलं. तसेच ज्या ठिकाणी पंतप्रधानांचा ताफा थांबला होता, तो अत्यंत असुरक्षित भाग मानला जातो. त्यानंतर मोदींना हा दौरा रद्द करावा लागला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? कॉंग्रेसच्या या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणतात…

News Desk

भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून EDच्या केसेसमध्ये चार पटीने वाढ

Darrell Miranda

भाजपला धक्का! मूकूल रॉय यांची ममता दीदींच्या उपस्थितीत घरवापसी

News Desk