HW News Marathi
Covid-19

१९ जूनला पंतप्रधानांची सर्वपक्षीय बैठक, भारत-चीन संघर्षावर होणार चर्चा

नवी दिल्ली | भारत-चीन सीमा भागात निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १९ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांनी येत्या शुक्रवारी म्हणजेच १९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता ही सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत देशभरातील विविध राजकीय पक्षांच्या अध्यक्षांचा समावेश असले. गेल्या काही दिवसांत भारत-चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने आज (१७ जून) याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

कोरोनाचे संकट एकीकडे मोठे होत जात असताना आता दुसरीकडे देशासमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन संघर्ष पुन्हा उफाळून यायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. दिवसेंदिवस भारत-चीनमधील हा वाद चिघळताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आजही नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजारांहून अधिक

News Desk

राज्यात आज १५ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधितांचा तर ४८ जणांचा मृत्यू

News Desk

कोरोनाच्या संकटातून एकजुटीने महाराष्ट्राला बाहेर काढू !

News Desk