HW News Marathi
Covid-19

भय इथले संपत नाही! रुग्णवाढीचा स्फोट कायम, देशात गेल्या २४ तासांत ३ लाखांच्यावर रुग्ण

नवी दिल्ली | देशातील कोरोना संकटाचं भय कायम आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. देशात विक्रमी वाढ होत आहे. तर दुसरीकडे मृतांच्या आकड्यात कोणतीही घट होताना दिसत नाहीये. देशात गेल्या २४ तासांत ३,९२,४८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर साडेतीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. २४ तासांत देशात ३ लाख ९२ हजार ४८८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ३ हजार ६८९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याच कालावधीत देशभरात ३ लाख ७ हजार ८६५ हजार रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात सध्या ३३ लाख ४९ हजार ६४४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर देशातील एकूण मृत्यूंची संख्या २ लाख १५ हजार ५४२ हजार इतकी झाली आहे.

 

महाराष्ट्रात ८०२ रूग्णांचा मृत्यू

राज्यात का (१ मे) ८०२ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ६३ हजार २८२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे. ६१ हजार ३२६ रुग्ण बरे देखील झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.२४ टक्के आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

News Desk

काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई, पण मारहाण करणे चुकीचेच

News Desk

देशात करोनामुळे एका दिवसात ५० डॉक्टरांचा मृत्यु ! दुसरीकडे देशात रूग्णसंख्येत पुन्हा घट

News Desk