HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या आणि मृत्यू दर वाढल्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांत होणार चर्चा!

नवी दिल्ली | भारतात कोरोना संक्रमण वाढत चालले आहे. अशात आरोग्य मंत्रालयाने चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. पुढचे ३ महिने आव्हानात्मक असू शकतात, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. थंडीमध्ये कोरोना आणखी घातक होऊ शकतो, इतकेच नाही तर देशात सण सुरू होत आहेत, त्यामुळे संक्रमण आणखी जलद वाढू शकतं, अशी भीती आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. त्यामुळे आज (२३ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाची बैठक घेणार आहेत. देशाच्या ७ राज्यांमध्ये कोरोना जास्त प्रमाणात वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, पंजाब आणि दिल्लीचा समावेश आहे.

केंद्र सरकार राज्यांमधल्या परिस्थितीबाबत माहिती घेत आहे आणि गरजेची मेडिकल इक्विपमेंट्स क्लबही करत आहेत, असं राजेश भुषण यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या ७ राज्यांसोबत समीक्षा बैठक घेणार आहेत. कोरोना संक्रमण अधिक असणाऱ्या या राज्यांसाठी काय पावलं उचलायची? याचे निर्देशही केंद्र सरकार देऊ शकतं. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित असणार आहेत.

एकीकडे थंडीत कोरोना संक्रमणाबाबत आरोग्य मंत्रालयाने ही भीती व्यक्त केली असली तरी देशात रुग्ण बरे होण्याची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ८० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत भारतात ४४.९ लाख कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. जगभरात रुग्ण बरे होण्याची ही संख्या सर्वाधिक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तिसऱ्या लाटेसाठी तयार रहा’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला निर्देश !

News Desk

२४५ रुपयांच्या रॅपिड टेस्टिंग किटची खरेदी ६०० रुपयांना का?, विरोधकांचा केंद्र सरकारला सवाल

News Desk

१२वीचा १५ जुलैपर्यंत आणि १०वीचा जुलै अखेरीपर्यंत निकाल लागण्याची शक्यता

News Desk