HW News Marathi
देश / विदेश

देशभरात महाराष्ट्रासह १४ राज्यातील ११५ मतदारसंघासाठी आज होणार मतदान

मुंबई | देशभरात आज (२३ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह १४ राज्यातील ११५ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण १४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याचबरोबर गुजरातमधील सर्वच्या सर्व २६ लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान पार पडणार असून २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

महाराष्ट्रातील जालना, बारामती, जळगाव, रावेर, औरंगाबाद, माढा, अहमदनगर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग इत्यादी अत्यंत महत्त्वाचे १४ मतदार संघांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश आहे. या टप्प्यात दिग्गज राजकीय नेत्यांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. म्हणूनच भारतीय निवडणूक आयोगाने तिसऱ्या टप्प्यातील सर्वच मतदार संघात चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात बहुचर्चित अशा जालना मतदारसंघातून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, बारामतीतून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले, हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, अहमदनगरमधून भाजपचे सुजय विखे पाटील तर गांधीनगर मतदारसंघातून भाजपचे अध्यक्ष अमित शहा, वायनाड मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अशा अनेक बहुचर्चित नेत्यांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी हा आदर्श ! राष्ट्रीय स्तरावरही तेच व्हायला हवे । संजय राऊत

News Desk

श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही- पंतप्रधान

News Desk

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाची तातडीची बैठक

News Desk