HW News Marathi
देश / विदेश

प्रमोद मुतालिक यांनी केली गौरी लंकेश यांची कुत्र्यांशी तुलना

मुंबई | काँग्रेसच्या काळात कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी २ हत्या झाल्या होत्या. तेव्हा काँग्रेस सरकार शांत होते. त्यावेळी मात्र कोणीही काँग्रेसला प्रश्न विचारला नाही. परंतु गौरी लंकेश यांच्या मृत्यूनंतर मोदी गप्प का? असा सवाल सर्वजण उपस्थित करत आहेत. पंतप्रधान मोदींनी या बद्दल का बोलावे ? म्हणजे कर्नाटकात एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला, तर त्यावर मोदींनी प्रतिक्रिया द्यावी, अशी अपेक्षा तुम्ही का करता ?, असे वादग्रस्त विधान श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केले आहे.

५ सप्टेंबर २०१७ रोजी परशुराम वाघमारे याने गौरी लंकेश यांच्यावर चार गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. गौरी लंकेश यांच्या हत्ये प्रकरणी कर्नाटकच्या एसआयटीने महाराष्ट्रातून परशुराम वाघमारे याला अटक केली आहे. धर्माच्या रक्षणासाठी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली परशुरामने दिली असल्याचा दावा कर्नाटकच्या एसआयटीने केला आहे.

संबंधित बातम्या – धर्माच्या रक्षणासाठी गौरी लंकेश यांची हत्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

अनंतनागमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

मनमोहन सिंग यांच्या काळापासून फोन टॅपिंग सुरु, फडणवीसांचा दावा

News Desk