HW News Marathi
देश / विदेश

भारतरत्न जाहीर झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी केले ‘हे’ विधान

नवी दिल्ली | भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राने प्रणव मुखर्जी यांच्यासह समाजसेवक नानाजी देशमुख (मरणोत्तर) आणि प्रसिद्ध गायक भूपेश हजारिका (मरणोत्तर) यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर ट्विटरद्वारे त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मी देशाच्या नागरिकांप्रती विनम्रता आणि कृतज्ञता व्यक्त करत मला जाहीर झालेल्या अत्यंत महान अशा भारतरत्न पुरस्काराचा स्वीकार करतो. मी नेहमी सांगत आलो आहे आणि पुन्हा सांगतो कि या महान देशाच्या लोकांनी मला मी त्यांना दिल्या त्यापेक्षा कायमच खूप जास्त गोष्टी दिल्या आहे”, असे म्हणत प्रणव मुखर्जी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राममंदिर भूमीपूजनाचं निमंत्रण नाही,फक्त ‘या’मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

News Desk

सुषमा स्वराज यांचे दुर्मिळ फोटो!

News Desk

राहुल यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्याला मसूद अझहर ‘जी’ म्हणाले

News Desk