HW News Marathi
देश / विदेश

आलोक वर्मांची दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करावी !

नवी दिल्ली | सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या याचिकेवर आज(२६ ऑक्टोबर)ला सुनावणी झाली. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या विरोधातील चौकशी दोन आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीव्हीसीला दिले आहेत.

न्यायमूर्ती गोगोई यांनी सांगितले की, १० दिवसांत चौकशी पूर्ण करावी. “सर्वोच्च न्यायलयाने निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक किंवा सध्याच्या न्यायाधीशांच्या निरीक्षणाखाली व्हावी, अध्यक्षतेखाली सीबीआय संचालक आलोक वर्मां यांची चौकशी करण्याचा आदेश सीव्हीसीला दिले आहेत.” सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या बाजूने फली.एस.नरीमन यांनी युक्तीवाद केला. सीव्हीसीकडून सॉलिसीटर जनरल तृषार मेहता यांनी त्यांची बाजू मांडली.

या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार असून केंद्र सरकारने नियुक्त केलेले सीबीआयचे अंतरिम संचालक एम. नागेश्वर राव यांना नियमित काम पाहण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु नागेश्वर राव यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज मध्यरात्री दिसणार खंडग्रास चंद्रग्रहण

News Desk

जम्मू-काश्मीरमधील १२ पोलीस झाले दहशतवादयांना सामील

News Desk

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन 

Aprna
मुंबई

मुंबईमध्ये उभी राहिली ‘माणुसकीची भिंत’

News Desk

मुंबई | ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या ब्रीदवाक्याला पूर्णपणे न्याय देऊ पाहणारी ‘सुनील शिंदे वेल्फेअर ट्रस्ट’ ही संस्था यंदा ‘माणुसकीची भिंत’ ही संकल्पना राबवत आहे. ‘सक्षम भारत’ या उपक्रमाअंतर्गत ही संकल्पना राबविण्यात येणार असून गेल्या काही वर्षांपासून पुणे, कोल्हापुर, नागपूर, अकोला, जालना आणि मुंबई अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये ‘माणुसकीची भिंत’हा उपक्रम राबविण्यात आला होता. माणुसकीच्या तत्वाला आधार देणारी ही ‘माणुसकीची भिंत’ दिनांक, २५ ऑक्टोबर बुधवार ते २८ ऑक्टोबर रविवार पर्यंत असणार आहे. ही भिंत रहेजा टॉवरच्या बाजूला, नेरलॉक पेंटच्या समोर, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल (प) मुंबई या ठिकाणी उभारण्यात आली आहे.

‘गरजवंतांमधील दुवा होऊन निस्वार्थी भावनेने त्यांच्यापर्यंत मदत पोहोचावी’ हा एकमेव उद्देश समोर ‘सुनील शिंदे वेल्फेअर ट्रस्ट’ या संकल्पनेला हातभार लावत आहेत.. आपल्याजवळ असलेल्या अनावश्यक वस्तू गरजवंतांच्या उपयोगी याव्यात याकरीता ही भिंत उभारण्यात आली आहे. मदत करण्याची इच्छा असलेली प्रत्येक व्यक्ती सढळ हाताने या गरजूंना मदत पुरवू शकते. फक्त कपडेच नव्हे तर वापरण्याजोगी खेळणी सुद्धा दान करता येणार आहेत.

”या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब, दुर्बल घटकांतील गरजवंतांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण देता यावे यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न असून मुंबईकरांनी आपल्या परीने या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा ” असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ‘पुंडलिक लोकरे’ यांनी केले आहे.

‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाचे मुख्य आकर्षण

यंदा फक्त कपडेच गरजवंतांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश नसून दान म्हणून आलेल्या वस्तूंवर योग्य ती प्रक्रिया करुन ते त्या वस्तू वापरण्यायोग्य बनवून गरीब गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संस्था पूर्णपणे घेणार आहे.

यंदा दान करता येण्यासारख्या गोष्टी आणि त्यामागील उद्देश :

कपडे : आपण सर्व प्रकारचे लहान, मोठयांचे, स्त्री, पुरुषाचे कपडे, चादर, ब्लॅंकेट, इत्यादी दान करू शकता. ते कपडे धुवून, दुरुस्त करून , इस्त्री करून , पॅकिंग अशा प्रकारच्या त्यावर प्रक्रिया करून ते गरीब, गरजवंतांपर्यंत पोहचवले जातात.

सायकल : आपण दान केलेली सायकल रिपेअरिंग करून ती वापरण्या योग्य बनवून आदिवासी व खेडेगावातील विद्यार्थी ज्यांना दूरचा प्रवास करणे शक्य नसल्याने शाळा अर्ध्यावर सोडावी लागते अश्या विध्यार्थ्यांना देण्यात येतात.

खेळणी : आपण दान केलेली खेळणी गरीब, निराधार, बेवारस, दुर्धर आजाराने ग्रस्त अशा मुलांना देऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न असतो. आपले सहकार्य कोणाच्या तरी आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करु शकतात.

Related posts

Mumbai Dongri Building Collapsed : मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत !

News Desk

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, काही भागात साचले पाणी

News Desk

मुंबई, उपनगर, वसईसह पालघरमध्ये जोरदार पाऊस

News Desk