HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेथे बोलायचे तेथे बोलत नाहीत – शरद पवार

पुणे | ‘काँग्रेस सरकारच्या काळात मनमोहन सिंग यांना न बोलणारा पंतप्रधान म्हणून त्यांच्यावर टीका केली जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या तुलने खूप बोलतात. परंतु जेथे बोलायचे तेथे बोलत नाहीत,’ अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. उन्नाव आणि कथुआ बलात्कार प्रकरणावरुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. भाजपच्या नेत्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे.

तसेच उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बसपाने एकत्र येत भाजपचा पराभव केला. देशातील ६ ते ८ निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला. या आधी कोणत्याही सत्ता धारी पक्षाला इतके अपयश कधीच आले नाही, असे देखील शरद पवार यांनी यावेळी म्हटले. निसर्ग मंगल कार्यालय प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडीसाठी झालेल्या बैठकीत भाजप सरकारवर टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गुजरातमध्ये जीप आणि ट्रकचा भीषण अपघात, डोंबिवलीतील ११ जणांचा मृत्यू

News Desk

राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला होणार !

News Desk

एससी-एसटी कायद्यातील दुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

News Desk
महाराष्ट्र

मित्र पक्षाने रडीचा डाव खेळू नये – शरद पवार

swarit

पुणे | ‘ज्या जागा आम्ही जिंकल्या त्या आम्हालाच मिळाव्यात. मित्र पक्षाने रडीचा डाव खेळू नये,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. मित्र पक्षांशी बोलून पोटनिवडणुकांबाबत समन्वयाची भूमिका घेण्याचा प्रयत्न असल्याचे शरद पवार निसर्ग मंगल कार्यालय प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडीसाठी झालेल्या बैठकीत बोलत होते.

पुढील काळात काही जागांसाठी विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. तर महिला, दलित, शेतकरी, आदिवासी आणि अल्पसंख्याकांबद्दल सरकारची बांधिलकी नसल्याचे दिसत आहे. तसेच पालघर-गोदिंया या लोकसभा मतदारसंघात, सांगलीत पलूस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहेत.

ईव्हीएम मशीनची चाचणी

मतदान सुरु होण्यापूर्वी संबंधित केंद्रातील ईव्हीएम मशीनची चाचणी व्हावी, यासाठी आग्रह धरला पाहिजे, असे शरद पवार या कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते. सध्या या मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर अनेक पक्ष एकत्र येत असल्याचे देखील पवारांनी सांगितले.

 

Related posts

आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू! – मुख्यमंत्री

Aprna

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार | मुख्यमंत्री

swarit

भोसरी प्रकरणात खडसे,पत्नी आणि जावयाविरोधात ‘ईडी’कडून आरोपपत्र!

News Desk