HW News Marathi
देश / विदेश

झारखंडमध्ये खाजगी बसचा भीषण अपघात, ११ जणांचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली | झारखंड येथे हजारीबाग जिल्ह्यात दानुआ घाटीत राष्ट्रीय महामार्गावर आज (१० जून) झालेल्या एका खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.

बिहारच्या दिशेने जाणाऱ्या या खासगी बसचा पहाटे ३.३० वाजता भीषण अपघात झाला आहे. या बसला लोखंडी रॉडने भरलेल्या ट्रेलरची धडक बसली. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा बसवरील नियंत्रण सुटले आणि या बसचा अपघात झाला. या अपघाताबाबतची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच बसमध्ये अडकलेले मृतदेह तातडीने बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या पंतप्रधान साधणार देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

News Desk

शरद पवार बोलले ‘तो’ राष्ट्रवादीचा अजेंडा, मात्र शिवसेनेचे हिंदुत्त्व जगजाहीर !

News Desk

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबई ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन

News Desk