HW News Marathi
देश / विदेश

मोटारमनशिवाय १३ किलोमीटर धावली रेल्वे

नवी दिल्ली: रेल्वे विभागाचा गलथान कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. गुरुवारी सकाळी स्टेशनपासून १३ किलोमीटर दूर अंतरावर धावली. दुस-या इंजिनच्या सहाय्याने एका मोटारमनने मोठे धाडस दाखवून ही रेल्वे थांबली. यामुळे अनेकांचे प्राण वाचले व मोठा अनर्थ टळला. कर्नाटक राज्यातील कुलबर्गी येथे ही घटना घडली. दरम्यान, दुसरीकडे मुंबईत मध्य रेल्वेचा गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुण्याकडे रवाना झालेल्या प्रगती एक्स्प्रेसचं इंजिन ठाणे आणि मुलुंडदरम्यान बंद पडल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने मुंबईकर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.घराकडे निघालेल्या प्रवाशांची कोंडी होऊ नये म्हणून जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. मात्र ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने मुंबईतील स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुरक्षेतील त्रुटीनंतर मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Aprna

खड्ड्यामुळे दरदिवशी सहा जणांचा बळी

News Desk

कैद्यांना भेटायला आलेल्या मुलींच्या चेहऱ्यावर मारले शिक्के

News Desk