HW News Marathi
देश / विदेश

प्रियांका गांधी वॉड्राला उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

नवी दिल्ली | सोनभद्र हत्याकांडातील पिडितांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या उत्तर प्रदेशाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वॉड्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मीर्झापूर नारायण चौकीजवळ प्रियांका गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. “मला पोलिसांना का ताब्यात घेतले, मला माहिती नाही. कुठे घेऊन जातायेत हेही मला माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी केला आहे. त्यामुळे आता सोनभ्र हत्याकांडावरून राजकारण तापयला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी सोनभद्रमध्ये सचार बंदी लागू केली आहे.

सोनभद्र येथे १० जणांच्या हत्याकांडानंतर प्रियंका पीडित कुटुंबीयांची भेट घेणार होत्या. मात्र, सोनभद्र येथे पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखल्याने प्रियंका या नारायणपूर येथे धरण्यावर बसल्या होत्या. प्रियंका म्हणाल्या की, ‘मी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात होती. आम्ही केवळ ४ जण भेटायला गेलो असल्याचे सांगितले होते. परंतु हे सर्व सांगून देखील मला तिथे जाऊ दिले नाही. आम्हाला पिडितांना भेटण्यापासून का रोखले जात आहे, ते तरी सांगावे. तोपर्यंत आम्ही शांततेत बसून राहणार आहोत’, असे ही त्या म्हणाल्या. काही वेळाने पोलिसांनी प्रियंका गांधी यांना चुनार गेस्ट हाऊसमध्ये नेण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन

News Desk

अखेर धर्म संसदेने निश्चित केली राम मंदिर निर्माणाची तारीख

News Desk

राहुल गांधी यांनी पुन्हा डागले मोदींवर टीकास्र

News Desk