HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : केंद्राने काश्मीरमधील ५ फुटीरतावादी नेत्यांचे संरक्षण काढून टाकले

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राकडून कडक कारवाईला सुरुवात झाली आहे. केंद्राने काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांच्या विरोधात कारवाई करत काश्मीरमधील ५ फुटीरतावादी नेत्यांना असलेले संरक्षण काढून टाकले आहे. केंद्राच्या आदेशानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

मीरवाइझ उमर फारुख, अब्दुल गनी बट्ट, बिलाल लोनस हाशमी कुरैशी आणि शब्बीर शाह या फुटीरवाद्यांचा यात समावेश आहे. आज संध्याकाळपर्यंत या फुटीरतावादी नेत्यांचे सर्व संरक्षण आणि सरकारी सुविधा काढून टाकण्यात येतील. त्याचप्रमाणे यानंतर कुठल्याही फुटीरतावादी नेत्याला सरकारी खर्चाने संरक्षण देण्यात येणार नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या या फुटीरवादी नेत्यांच्या संरक्षणावर सरकार तब्बल ७ कोटी रुपये खर्च करीत आहे.

जम्मू काश्मीर सरकारने १० वर्षांपूर्वी या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेल्या या फुटीरतावादी नेत्यांना संरक्षण पुरवले होते. मात्र, आता पुलवामा हल्ल्यानंतर या फुटीरतावादी नेत्यांचे संरक्षण काढून घेण्याची मागणी जोर धरत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांनी केली पीएम-श्री योजनेची घोषणा

Manasi Devkar

व्यायाम करताना गुप्तांग अकडले प्लेटमध्ये

News Desk

संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठा जोपासणार- व्यकंय्या नायडू

News Desk