HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : जावेद अख्तर-शबाना आझमी देशद्रोही, सिद्धूची गाढवावरुन धिंड काढावी !

मुंबई | जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आले आहे. पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. देशभरातून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. या घटनेचे जगभरातून संतापाची लाट उसळली आहे. अभिनेत्री कंगना राणावतनेही तिचा संताप व्यक्त करत शबाना आझमींवरही देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे. तसेच नवज्योत सिंग सिद्धूवर देखील टीकास्त्र सोडले आहे.

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी हे देशद्रोही असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे. पुलवामा हल्ल्याबाबत बोलत असताना कंगना म्हणाली की,‘जावेद अख्तर आणि शबाना आझमी हे पाकिस्तानशी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आदानप्रदान करतात. हे तेच लोक आहेत, जे ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांचे समर्थन करतात. ‘उरी’ हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही, यांना पाकिस्तानमध्ये जाऊन कार्यक्रम करण्याची गरजच काय आहे? असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे.

परंतु ऐवढेच बोलून कंगना थांबली नाही. कंगनाने माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी काल (१६ फेब्रुवारी) पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी हिंसा नव्हे तर संवाद हवा, असे म्हणाले होते. यावर कंगनाने नाव न घेता सिद्धूंवर निशाणा साधला. ती म्हणाली, जवानांवर हल्ला केला जात आहे आणि काही लोक अहिंसा आणि शांतीच्या गोष्टी करत आहेत. असे म्हणणाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरुन धिंड काढली पाहिजे, अशा शब्दात तिने सिद्धूंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणी मध्यस्थी समितीला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

News Desk

कर्नाटकमध्ये क्रेन कोसळून सहा जणांचा जागीच मृत्यू

News Desk

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद

News Desk