HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : कोणीही पाकिस्तानला धमकावू शकत नाही | पाकिस्तान

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने भारतीय जवानांवर भीषण हल्ला केला. या हल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. असे असताना आता पाकिस्तानने पुन्हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. “कोणीही पाकिस्तानला पुलवामा हल्ल्याबाबत धमकावू शकत नाही”, असे वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केले आहे. कुरेशी हे सध्या जर्मनीत असून त्यांनी एका व्हिडीओमार्फत हे वक्तव्य केले आहे.

“पाकिस्तानला दोष देणे सोपे आहे, परंतु त्यामुळे हा प्रश्न सुटणार नाही”, असे कुरेशी यावेळी म्हणाले. तसेच भारताने चौकशी न करताच आपल्यावर आरोप लावल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. “भारताने त्या संदर्भात पुरावे दिले तर पाकिस्तान चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करेल”, असेही ते यावेळी म्हणाले. पुलवामा हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला आहे. तसेच दहशतवादी कारवाया, दहशतवादी संघटनांना पाकिस्तानकडून होणारी मदत बंद व्हावी, अशीही मागणी जगभरातून जोर धरत आहे. “पाकिस्तानला धडा शिकवावा” अशीही जोरदार मागणी भारतातून होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुत्र्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने दोघींची आत्महत्या

News Desk

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

News Desk

हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय? याचा देशाच्या तिजोरीला उपयोग होणार?

News Desk