HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : सर्वपक्षीय बैठक, देशाच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या भीषण हल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार असल्याचा इशारा शुक्रवारी (१५ जानेवारी) सरकारकडून देण्यात आला आहे. याप्रकरणी आज (१६ फेब्रुवारी) एक तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत हल्याबाबतची संपूर्ण माहिती, पुढची कारवाईबाबत सविस्तर माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.

संसदेच्या ग्रंथालायाच्या सभागृहात शनिवारी (१६ फेब्रुवारी) ११ वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत अशा प्रकारच्या दहशतवादी हल्यांच्या पार्श्वभूमीवर राजकारण न करता संपूर्ण देशाने एकत्र या परिस्थितीचा सामना करावा असे आवाहन करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचे सांगितले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. दरम्यान आज (१६ फेब्रुवारी) होणाऱ्या या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही महत्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अरुणाचल प्रदेशातून भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान बेपत्ता

News Desk

दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

संसदेबाहेरील स्वच्छता मोहिमेवरून हेमा मालिनी ट्रोल, ‘हे’ आहे कारण

News Desk