HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही | पंतप्रधान मोदी

जम्मू-काश्मीर । जम्मू-काश्मीरमधील अवंतीपुरा भागात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) अतिरेक्यांकडून करण्यात आलेला भ्याड हल्ला हा जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यात भारताचे तब्बल ३८ जवान शहीद झाले आहेत. जैश ए मोहम्मद या संघटनेकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. अतिरेकी आदिल अहमद डाल याने हा हल्ला घडवून आणला असल्याची माहिती मिळत आहे.

“या आत्मघाती हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असून शांततेचा भंग करणाऱ्यांना धडा शिकवू”, असा इशारा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. “जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही”, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी यावेळी दिले आहे. भारतात कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आलेला हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. हा हल्ला घडवून आणण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच भारतासाठी एक अतिशय चिंतेची बाब बनली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; UK न्यायालयाचा मोठा निर्णय

News Desk

शरद पवारांसह विरोधीपक्षातील दिग्गजांचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींची भेट घेणार

News Desk

अरूण जेटली 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार

News Desk