HW News Marathi
Covid-19

सीरम आणि भारत बायोटेक कंपनीत लसीवरुन निर्माण झाला वाद

मुंबई | संपूर्ण देशाला कोरोना लसीकरणाची प्रतीक्षा असताना आपत्कालीन वापराची परवानगी मिळालेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लस उत्पादन कंपन्यांमध्ये ‘लसकारण’ रंगलेले पाहायला मिळाले. लस आणि तीची परिणामकारकता याची आकडेवारी उपलब्ध नसतानाही स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लशीला परवानगी दिल्यामुळे होणाऱ्या टीकेला उत्पादक कंपनी भारत बायोटेकने सोमवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. लशीच्या २०० टक्के प्रामाणिक चाचण्या केल्या आहेत, आमच्यावरील टीका अनाठायी आहे, असे कंपनीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.

फायझर, मॉडर्ना आणि आणि ऑक्सफर्डच्या लशी वगळून अन्य लशींवर ‘केवळ पाण्याइतक्या सुरक्षित’ अशा शब्दांत टीका करणाऱ्या ‘सीरम’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांचा नामोल्लेख टाळून ‘कोव्हॅक्सिन’ लशीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा इल्ला म्हणाले, ‘‘आम्ही २०० टक्के प्रामाणिकपणे लशीच्या चाचण्या केल्या असूनही आमच्यावर टीका करण्यात येते. जर माझे म्हणने चुकीचे असेल तर सांगा, पण काही कंपन्यांनी भारत बायोटेकच्या लशीला पाण्याची उपमा दिली आहे.

‘‘आमच्यावरील टीका अनाठायी आहे. कंपनीकडे लशी विकसित करण्याचा प्रचंड अनुभव आहे, आतापर्यंत १६ लशींचे उत्पादन केले आहे. आमची कंपनी जागतिक आहे, अनअनुभवी असल्याचा आरोप करू नये’’, असे डॉ. इल्ला यांनी स्पष्ट केले. आमच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्याच्या परिणामकारकतेची आकडेवारी मार्चपर्यंत उपलब्ध करण्यात येईल, असेही म्हणाले. कोव्हॅक्सिनच्या चाचण्या भारतातच सुरू आहेत, असे नाही तर ब्रिटनसह जगातील बाराहून अधिक देशांमध्ये आम्ही चाचण्या केल्या आहेत, असे कृष्णा म्हणाले. बहुतेक लोक भारतीय कंपन्यांवर टीका करण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर वेगळ्या मार्गानी गप्पा मारत असतात. असे करणे अयोग्य आहे, आम्हाला ते अपेक्षित नाही, असेही त्यांनी म्हटले केले आहे.

दरम्यान, या वादानंतर आता अदार पुनावाला आणि डॉ. कृष्णा इल्ला यांनी एका पत्रकातून या वादाला पुर्ण विराम दिला आहे…कोरोना लस सध्या सर्व भारतीयांना देणे हे महत्वाचे काम आहे त्यासाठी सीरम आणि भारत बायोटेक एकत्र येऊन काम करणार असल्याचे या पत्रात लिहिले आहे…सध्या कोरोना लसीची निर्मिती, वितरण हे महत्वाचे आहे…आम्ही दोन्ही कंपन्या कामासाठी सज्ज आहोत…सर्व भारतीयांना लस देणे हे आमचे प्रमख काम आहे.. या कोरोना लसीचे ोकांसठी काय महत्व आहे हे आम्ही जाणतो आणि ते लक्षात घेत काम करणार अशल्ाचे सीरमचे सीईओ अदार पुनावाला आणि भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा इल्ला यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राने चीनला देखील टाकले मागे!

News Desk

कोरोनाची दुसरी लाट ओळखताना उशीर झाला, पण महाराष्ट्रात तिसरी लाट येऊ द्यायची नाही – उद्धव ठाकरे

News Desk

महाविकासआघाडी ५ जागांवर लढणार, विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार !

News Desk