HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधीनी माफी मागावी | रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी (२४ सप्टेंबर) एका कार्यक्रमात सोशल मीडिया वॉलिंटिअर्ससोबत संवाद साधताना मोदींवर टीका केली होती. राहुल म्हटले होते की, ‘आता खऱ्या खेळाला सुरुवात झालीय’ अजून पुढे पाहा आणखी मजा येणार आहे.

 

तसेच ‘येणाऱ्या दोन-तीन महिन्यांमध्ये आम्ही तुम्हाला आणखी गंमत दाखवू. तसेच नरेंद्र मोदींची जी कामे राफेल, ललित मोदी, विजय माल्या, नोटाबंदी आणि गब्बर सिगं टॅक्स या सर्वांमध्ये चोरीची कृती आहे. मोदी यांची एक-एक प्रकरण बाहेर काढून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की ‘चौकीदार नाहीत, तर ते चोर आहेत.’

राफेल डीलवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘आता खऱ्या खेळाला सुरुवात झालीय’ या विधानावर भाजपचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आक्षेप नोंदवला आहे. ‘विरोधी पक्षाच्या अध्यक्षाने देशाच्या पंतप्रधानांविरोधात अशा प्रकारच्या भाषेचा वापरली जात नसल्याचा आरोप’, प्रसाद यांनी यावेळी केला आहे.

राहुल गांधी सारख्या बेजबाबदार आणि खोटारडा माणूस अध्यक्ष असणे, ही काँग्रेस पक्षासाठी शरमेची बाब आहे. नॅशनल हेराल्ड असो की बोफोर्स घोटाळा असो त्यांचा संपूर्ण परिवार घोटाळ्यांमध्ये बुडालेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वडीलांच्या अंत्यसंस्कारात मुली नाचतात तेंव्हा..

News Desk

निर्मला सीतारामण यांचा आजचा शेवटचा अर्थसंकल्प ?

swarit

द्रौपदी मुर्मू: भारताच्या 15 व्या राष्ट्रपतींबद्दल माहित नसलेल्या घटना

News Desk