HW News Marathi
Covid-19

देशाच्या अर्थव्यवस्थेवर रघुराम राजन यांच्यासोबत राहुल गांधींनी केली ‘या’ मुद्द्यावर चर्चा

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमध्ये बहुतांश उद्योगधंदे बंद असल्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी आरबीआयचे गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांच्या व्हिडिओद्वारे संवाद साधत कोरोना व्हायरसमुळे देशातील अर्थव्यवस्थेवरील वाईट परिणाम यावर चर्चा केली आहे. राहुल गांधी आणि रघुराम राजन यांच्यामधील झालेल्या संवादाचे काँग्रेसच्या मीडिया प्लॅटफॉर्मवर आज (३० एप्रिल) ९ वाजता प्रसारित करण्यात आले.

लॉकडाऊनमुळे देशातील गरिबांसमोरील मोठ्या समस्या उभ्या राहत आहेत. यासाठी केंद्र सरकारला ६५ हजार कोटी रुपये खर्च करावेल लागतील, असे रघुराम राजन यांनी सांगितले. कोरोनासारख्या संकटाचा सामना संपूर्ण जग करत आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर जगात मोठे बदल होतील. यात भारत आपले वेगळे स्थान निर्माण करु शकतो, यासाठी भारताने आरोग्याच्या, रोजगाराच्या संधी निर्माण करायला हव्यात, असे राजन यांनी राहुल गांधीसोबत झालेल्या चर्चेत सांगितले.

लॉकडाऊन संपवायचे असेल तर आपल्याला दररोज २० लाख चाचण्या कराव्या लागतील. अमेरिकेपेक्षा चौपट चाचण्या करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, याकडे राजन यांनी लक्ष वेधले. कोरोनाच्या संकटानंतर मध्यम आणि कनिष्ठ मध्यम वर्गाकडे चांगल्या नोकऱ्या नसतील. त्यासाठी सरकारने रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज आहे, असे राजन म्हणाले

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मुंबईत सध्या तरी लॉकडाउन लावण्याइतकी बिकट परिस्थिती नाही पण…”

News Desk

अमिताभ यांच्यानंतर अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाची लागण !

News Desk

कोरोनाच्या पहिल्या लाटेतच भारताने लस तयार केली!

News Desk