HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार नाहीत !

नवी दिल्ली | “काँग्रेसकडून कधीही राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी उमेदवार करायचे आहे असे सांगण्यात आलेले नाही. राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाविषयी चर्चा सुरू झाल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीने अशा प्रकारची चर्चा न करण्याचे देखील आवाहन केले होते.” असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी पी. चिदंबरम यांनी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची बाजू स्पष्ट केली आहे.

केवळ राहुल गांधीच नव्हे तर इतर कोणाच्याही नावाची घोषणा केली जाणार नाही, असेही चिदंमबरम यांनी स्पष्ट केले आहे. देशातील सर्वच राजकीय पक्षांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना आता अवघा काहीच महिन्यांचा अवधी राहिला आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विशेषतः काँग्रेसकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन महाआघाडीच्या माध्यमातून काँग्रेस भाजपला शह देण्याच्या प्रयत्नात आहेत.

गेल्या दोन दशकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत प्रादेशिक पक्ष मजबूत झाल्याचे पी चिदंबरम यांनी मान्य केले आहे. “आम्हाला भाजपला पराभूत करायचे आहे. सुधारणावादी, व्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करणारे, कर दहशतीला थारा न देणार , महिला आणि मुलाबाळांची सुरक्षा ठेवणारे, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणारे सरकार आम्हाला हवे आहे.” असे यावेळी पी.चिदंबरम म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपाचा पाया खचला, दिर्घ आजाराने वाजपेयींचे निधन

News Desk

‘प्रवीण तू चॅम्पियन, जपान गाजवून ये’, साताऱ्याच्या तिरंदाजाशी मोदींनी मराठीतून संवाद

News Desk

धनंजय मुंडे आमदार झाले,अमोल कोल्हेंचा प्रण पुर्ण झाला..मुंडे जेव्हा कोल्हेंना फेटा बांधतात!

Arati More
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी, सुधीर ढवळेंसह दोन जणांना अटक

News Desk

पुणे | पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजकांना भीमा कोरेवाग दंगली प्रकरणी अटक केली आहे. यात एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना पुणे, दिल्लीतून माओवाद्यांचे नेते रोना विल्सन आणि वकील सुरेंद्र गडलिंग यांना नागपूर या तिघांना पुणे पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी अटक केले आहे. मंगळवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी या तिघांना अटक केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने १ जानेवारी २०१८ रोजी आंबेडकरी अनुयायी येथे आले होते. तेव्हा दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून दगड फेक झाली होती. यात एक जण जखमी झाला असून एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडें यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून मिलिंद एकबोटे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

या दंगलपूर्वी शनिवार वाड्यावर एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना या तिघांचे कनेक्शनातून आढळून आले होते. त्यामुळे पुणे पोलिसांनी गेल्या महिन्यात या तिघांच्या घर व कार्यालयावर छापे टाकले होते.

Related posts

तडजोड केलेली नाही, भाजपची अडचण समजून घेतलीय !

News Desk

…आता भावना गवळी ईडी चौकशीला हजर राहणार?

News Desk

लाड यांचा काँग्रेस नेत्यांवर ५०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा

News Desk