HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींनी लग्न करावे आणि ‘हम दो हमारे दो’ याची अंमलबजावणी करावी, आठवलेंनी दिला सल्ला  

पिंपरी-चिंचवड | केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपलं भाषण आणि कवितांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी, असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिला आहे. रामदास आठवलेंनी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते.

राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावीलोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या हम दो हमारे दो धोरणावरून टीका केली होती. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राहुल गांधींना हा मोलाचा सल्ला दिला आहे.

कायदेच मागे घ्या ही शेतकऱ्यांची भूमिका असंवैधानिक – रामदास आठवलेकाँग्रेसनेही जाहीरनाम्यात शेतकरी कायद्याचे वचन दिले होते, याची आठवण आठवले यांनी करून दिलीय. शेतकरी आंदोलनावर बोलताना आठवले यांनी दिल्लीमधील शेतकरी हे आंदोलनाला वाढवत असल्याची टीका त्यांनी केलीय. सरकार चर्चेला तयार आहे, पण कायदेच मागे घ्या, ही शेतकऱ्यांची भूमिका असंवैधानिक असल्याची टीका त्यांनी केली.

काय म्हणाले होते राहूल गांधी ?

देशात सध्या मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांचा मुद्दा जोरदार गाजत असून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. असे असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. “हा देश फक्त ४ लोक चालवतात. हम दो हमारे दो !”, असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी यावेळी राहुल गांधी बोलत असताना भाजप खासदारांनी मोठ्या प्रमाणात गदारोळ घातला.

मोदी सरकारला सुनावताना यावेळी राहुल गांधी म्हणाले कि,“काही वर्षांपूर्वी ‘हम दो हमारे दो’ घोषणा देण्यात आला होती. आता जसा कोरोना आपल्या नव्या रूपात आला आहे त्याचप्रमाणे ही घोषणा देखील नव्या रुपात आली आहे. हा देश फक्त ४ लोक चालवतात ‘हम दो और हमारे दो’”, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. “नरेंद्र मोदी त्यांचा हेतू फक्त आपल्या मित्रांची मदत करणं हाच आहे. आपण सर्वसामान्यांना भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या हे तीन पर्याय दिले आहेत”, असा घणाघातही राहुल गांधींनी यावेळी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ayodhya Verdict : जाणून घ्या… कोण आहेत हे ३ मध्यस्थी जे काढतील तोडगा

News Desk

केंद्र सरकारची ४३ मोबाईल Apps वर बंदी 

News Desk

तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता?, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk