HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींनी घेतली मोदींची गळाभेट

नवी दिल्ली | मोदी सरकार विरोधात आज संसदेत अविश्वास ठरावावर सर्व पक्षांचे सदस्य आपली बाजू मांडणार आहेत. प्रत्येक पक्षाला आपला आपली बाजू मांडण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आला आहे. त्यामध्ये कॉंग्रेसला ३८ मिनीटे इतका वेळ देण्यात आला होता. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी संसदेत मोदी सरकारच्या कामाचा पाढा वाचला. मोदींसह अनेकांवर राहुल यांनी सडकून टिका केली.

मोदी गुजरात मध्ये जेव्हा चीनच्या राष्ट्रपतींसोबत झोके घेत होते, त्यावेळी सीमेवर चीनचे सैन्य घुसले होते. पंतप्रधान होण्यापुर्वी मी पंतप्रधान नाही तर जनतेचा चौकीदार आहे असे म्हणणारे मोदी देशाचे चौकीदार नसून भागीदार आहेत असे म्हणत यावेळी बोलताना राहुल यांनी मोदींवर निशाना साधला.

त्याचबरोबर यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी आपल्या जागेवरुन उठून मोदींची गळाभेट घेतल्याचे पहायला मिळाले. भाजपासाठी मी पप्पू असेन पण माझ्या मनात मोदी किंवा भाजपा विषयी कोणत्याही प्रकारचा राग नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. तसेच तुमच्या मनात माझ्या विषयी राग आहे. तुम्ही मला पप्पू म्हणू शकता, शिव्या देऊ शकता. मात्र माझ्या मनात तुमच्याबद्दल द्वेष नाही असेही यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज पुन्हा पेट्रोल १५ तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त

Gauri Tilekar

अखेर हार्दिक पटेल यांचे उपोषण मागे, सरकारकडून मात्र उपेक्षा

News Desk

“कुंभ आणि मकरजमध्ये कोणतीही तुलना होऊ शकत नाही कारण…”,उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यानी सांगितले उत्तर

News Desk
देश / विदेश

मोदी सरकारने आंध्र प्रदेशवर अन्याय केला | जयदेव गल्ला

News Desk

नवी दिल्ली | तेलगू देसमचे खासदार जयदेव गल्ला यांनी लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडताना आंध्र प्रदेशावर कसा अन्याय होत आहे. गल्ला यांनी अंध्रा प्रदेशातील जनतेची व्यथा मांडली. तेलंगणा हे नवे राज्य निर्माण झाल्यानंतर आंध्र प्रदेशावर कसा अन्याय झाला. याबद्दल गल्ला यांनी लोकसभेत त्यांचे मत मांडले. मूलभूत सोयी-सुविधापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये आंध्र प्रदेशावर अन्याय झाला आहे.

तेलंगणा राज्य निर्मितीचे विधेयक अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाल्याचे मत गल्ला यांनी लोकसभेत मांडले. आणि हे विधेयक मंजूर करण्यासाठी बळाचा वापर करून संमत केले असा देखील आरोप जयदेव गल्ला यांनी केला आहे. गल्ला लोकसभेत बोलत असताना त्यांच्या या विधानाचा तेलंगणा राष्ट्र समितीने विरोध करत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. तसेच आंध्र प्रदेशच्या जनतेचा मोदी सरकारने विश्वास घात केला आहे. यामुळे येत्या निवडणुकीत जनता चोख प्रत्युत्तर देईल. ही धमकी नाही, हा शाप असल्याचे जयदेव गल्ला यावेळी बोलत होते.

 

जयदेव गल्ला यांनी त्यांच्या भाषणात आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मागत आहेत. तसेच काँग्रेसने तेलगू तल्लीचे दोन तुकडे केले असा थेट आरोप गल्ला यांनी केला आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी यांनी आंध्र प्रदेशाला वाचवण्याची भाषा केली होती. म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो होती. परंतु मोदींनी त्यांचे आश्वासन पाळले नाही, असे देखील गल्लांनी यावेळी बोलत होते.

Related posts

मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा ! अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

‘आप’ने गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी इसुदान गढवी यांच्या नावाची केली घोषणा

Aprna

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर आज लोधी स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

News Desk