HW News Marathi
Covid-19

सरकाने जाहीर केलेल्या पॅकेजचे पैसे लोकांपर्यंत थेट का पोहोचवण्यात आले नाहीत?

नवी दिल्ली | अनेक दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भारतातील अनेक तज्ज्ञ व्यक्ती आणि उद्योगपतींशी संवाद साधत आहेत. आज (४ जून) त्यांनी देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान बजाज यांनी देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनवरही टीका केली.

भारताने शेजाऱ्यांकडून शिकण्याऐवजी केवळ अनुकरण केले. त्यांची भौगोलिक स्थिती, अन्य परिस्थिती आणि तापमान यांसारख्या गोष्टी निराळ्या आहे. आपण कठोर लॉकडाउन लागू करण्याचा प्रयत्न केला. परंतु तसे करता आले नाही. यामुळे अर्थव्यवस्थेवर मात्र मोठा परिणाम झाला. कोरोनाच्या आलेखाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आला असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टोलेबाजी केली.

आपण लागू केला तसा लॉकडाउन जगात कुठेही नव्हता. अशा प्रकारचा लॉकडाउन मी ऐकला नव्हता. अन्य देशांमध्ये लोकांना बाहेर पडण्याची आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी तसेच कोणालाही भेटायला जाण्याची परवानगी होती. परंतु आपल्याकडे बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांकडून मारहण करण्यात आली. त्यांचा अपमान करण्यात आला. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही सोडले नाही, असेही बजाज यांनी म्हटले.

सरकान अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी २० लाख कोटी रूपयांच्या पॅकेजची घोषणा केली. यावरही बजाज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जगभरातील ज्या देशांच्या सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी पॅकेजची घोषणा केली त्याच्या दोन तृतीयांश हिस्सा हा संघटना किंवा थेट लोकांपर्यंत पोहोचला. तर भारतात तो केवळ १० टक्के लोकांपर्यंतच पोहोचला. लोकांपर्यंत थेट पैसे का पोहोचवण्यात आले नाहीत? असा प्रश्न देखील त्यांनी या मुलाखतीत उपस्थित केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावतीत लॉकडाऊन आणखी ७ दिवसांसाठी वाढवला

News Desk

“महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेनेला काय मिळालंय?” भाजपच्या संजय काकडेंचा टोला

News Desk

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल! दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५० लाखांवर

News Desk