HW News Marathi
देश / विदेश

राजीव गांधी सामूहिक हत्याकांडाचे जनक, भाजपचे दिल्लीच्या चौकात पोस्टर्स

नवी दिल्ली | ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’ म्हणजेच जमावाकडून होणाऱ्या हत्याकांडाचे, सामूहिक हत्याकांडाचे जनक राजीव गांधी असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी हे पोस्टर्स चौकाचौकात लावण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी विधान केले होते की, १९८४ मध्ये झालेल्या शीख दंगलीत काँग्रेसचा सहभाग नव्हता. त्यांच्या या विधानानंतर भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काँग्रेसने अनेकदा म्हटले की, मोदी सरकारच्या काळात जमावाकडून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण वाढल्याचे आरोप केला आहे. गोहत्या गायींची वाहतूक, गोमांस अशा विविध मुद्यांवरून जमावाकडून हत्या झाल्याच्या घटना संपूर्ण देशभरात घडल्या आहेत. काँग्रेसने मोदी सरकारवर केलेल्या आरोपाचे भाजपचे पोस्टर लावून चोख उत्तर दिले आहे.

राहुल गांधी सध्या लंडन दौऱ्यावर असून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झालेल्या चर्चासत्रात बोलताना त्यांनी १९८४मध्ये झालेल्या शीख विरोधी हत्याकांड अतिशय वेदनादायी होते. कोणाही विरोधात कोणतीही हिंसा करणाऱ्यांना १०० टक्के शिक्षा व्हायला हवी. परंतु या हत्याकांडात काँग्रेसचा सहभाग नव्हता, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

खड्ड्यामुळे दरदिवशी सहा जणांचा बळी

News Desk

मुंबई विद्यापीठाला टॉप १०० मध्ये जागा नाही

News Desk

शिवसेना यूपीएमध्ये जाणार ‘या’ चर्चा केवळ माध्यमांमध्ये – राऊत

News Desk
मुंबई

मोनोरेलने गाठला १ सप्टेंबरचा मुहूर्त

Gauri Tilekar

मुंबई | गेल्या तब्बल ९ महिन्यापासून बंद असलेली मोनोरेल अखेर पुन्हा रुळावर धावणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अनेक अडचणींना पार करून १ सप्टेंबरचा मुहूर्त गाठला आहे. १ सप्टेंबर पासून मोनोरेलचा पहिला टप्पा सुरु करण्यात येणार आहे. मोनोचा पहिल्या टप्पा म्हणजेच चेंबूर ते वडाळा स्थानकादरम्यान मोनोरेलच्या ट्रायल रन सुरु आहेत.

गेल्या नऊ महिन्यांपासून आगीच्या दुर्घटनेमुळे यार्डात बंद पडलेल्या मोनोरेलमुळे एमएमआरडीएला रोज ७ ते ८ लाखाचे नुकसान सहन करावे लागत आहे. देशातील पहिला मोनो प्रकल्प सुरक्षेच्या कारणामुळे बंद असल्याने एमएमआरडीएला मोठ्या प्रमाणावर टिकांना सामोरे जावे लागले. या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.

Related posts

नगरसेवकांवर आता लवकरच सीसीटीव्हीची नजर

News Desk

गणेश विसर्जनात डीजे-डॉल्बीवर बंदी कायम | उच्च न्यायालय

swarit

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचविण्यासाठी बोटी, हेलिकॉप्टरची मदत

News Desk