HW News Marathi
मुंबई

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचविण्यासाठी बोटी, हेलिकॉप्टरची मदत

मुंबई | कल्याण, बदलापूरसह अंबरनाथ परिसरात आज (२७ जुलै) मध्य रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे वांगणी येथे महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली असून २ फूट पाणी ट्रॅकवर साचले आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून आतापर्यंत ११७ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले असून एक्स्प्रेसमध्ये आता ७०० प्रवासी अडकल्याची माहिती मिळाली आहे. एनडीआरएफ प्रवाशांना बचावण्याचे काम युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. ही एक्स्प्रेस काल (२६ जुलै)पासून १० वाजेपासून अडकली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी अडकले आहेत.

एनडीआरएफच्या ८ बोटी बचावकार्यासाठी रेल्वेजवळ पोहोचल्या आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी इंडिया रेफिने बोटी पाण्यात उतरवल्या आहेत. इंडिया रेफिने बचावकार्याचा वेग घेतला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात हेलिकॉप्टर पाठवणार असल्याची घोषणा केली आहे. रेल्वे रुळांच्या चारही बाजूला पाणी असल्याने व उल्हास नदीची पाणीपातळी वाढल्याने ही ट्रेन जवळपास दरवाजापर्यंत बुडाली आहे, मात्र प्रवासी सुखरूप आहेत तसेच प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर एसी डकमध्ये लागली आग

swarit

राज ठाकरे होणार सक्रीय पुन्हा नव्या जोमाने मैदान गाजवण्यास सज्ज…!

Adil

मुळा नदीचे पाणी झोपडपट्टीत शिरले; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

News Desk