HW News Marathi
देश / विदेश

ज्याने तिरंग्याचा अपमान केला त्याला पकडावं, टिकैत यांचा पंतप्रधानांवर पलटवार

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे पडसाद अजूनही उमटत आहेत. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाल्यानंतर लाल किल्ल्यावरही तणाव निर्माण झाला होता. या संपूर्ण घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली होती. तिरंग्याचा अपमानामुळे देश दुःखी झाल्याचंही पंतप्रधान म्हणाले. त्यावरून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पलटवार केला आहे.

पंतप्रधानांच्या या विधानावरून शेतकरी नेते राकेत टिकैत यांनी मोदींवर टीका केली. टिकैत म्हणाले,”सर्व देश तिरंग्यावर प्रेम करतो. ज्याने तिरंग्याचा अपमान केला आहे, त्याला पकडावं,” अशा शब्दात टिकैत यांनी मोदी यांच्यावर पलटवार केला. कृषी कायद्यांवरून शेतकरी व सरकारमध्ये पुन्हा चर्चा करण्याबद्दलही टिकैत यांनी भूमिका मांडली. “कोणतीही चर्चा दडपणाखाली होणार नाही. आम्ही या विषयावर चर्चा करू. ते आमचेही पंतप्रधान आहेत. त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आम्ही आभारी आहोत. त्यांनी आमच्या लोकांना सोडावं, अशी आमची इच्छा आहे. आम्ही त्यांचा आदर करू,” असं टिकैत म्हणाले आहेत.

काय म्हणाले मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’मध्ये मोदींनी देशभरातील वेगवेगळ्या घटनांबद्दल भाष्य केलं होतं. यात भारताने करोनाविरोधात दिलेली लढाई जसं जगासमोर एक उदाहरण ठरलं, तसंच आता लसीकरणही ठरतंय, असं मोदी यांनी नमूद केलं. तसेच यावेळी पंतप्रधानांतील प्रजासत्ताक दिनी झालेल्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केलं. प्रजासत्ताक दिनी झालेल्या तिरंग्याच्या अपमानानं देश दुःखी झाला, असं मोदी म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षणाला स्थगिती

News Desk

डीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी यांचे निधन 

News Desk

दिवाळी बोनस न दिल्यामुळे एअर इंडियाचे कर्मचारी संपावर

News Desk