HW News Marathi
देश / विदेश

राफेल डीलसाठी मोदी सरकारकडूनच रिलायन्सची निवड | फ्रान्स्वा ओलांद

नवी दिल्ली | राफेल डील खरेदी प्रकरणावरून निर्माण झालेले वाद अद्याप शांत होण्याची चिन्हे दिसत आहे. राफेल डीलमध्ये दिवसेंदिवस नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या विधानामुळे फ्रान्समध्येचे नाही तर भारतात देखील खळबळ माजल्यानंतर राफेल करारासाठी भारत सरकारने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स नावाचा प्रस्ताव पाठवला होता, असा नवीन खुलासा ओलांद यांच्याकडून करण्यात आला आहे.

राफेल डील ही दोन खासगी कंपन्यातील करार असल्यामुळे यात सरकारची कुठलिही भूमिका नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. परंतु ओलांद यांच्या दाव्यानंतर सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने मात्र ओलांद यांच्या दाव्यातील तथ्य तपासून पाहत असल्याचे म्हटले आहे.

फ्रान्सवा ओलांद यांनी फ्रान्समधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. भारत सरकारकडून रिलायन्सचे नाव देण्यात आल्यानंतर त्याची निवड करण्यात “द सॉल्ट एव्हिएशन” ची कोणतीही भूमिका नव्हती, असेही त्यांनी या लेखात म्हटले आहे. यानंतर मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठीच राफेल करार केला, अशी टीका यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली. राहुल गांधींनी ओलांद यांचे आभार मानत मोदींवर निशाणा साधला. ‘दिवाळखोर झालेल्या अनिल अंबानींसाठी मोदींनी कोट्यवधी रुपयांचा करार केला. त्यांनी देशाचा विश्वासघात केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राफेल घोटाळ्याची चौकशी टाळून मोदी सरकार कोणाला वाचवतय ?” काँग्रेसचा बोचरा सवाल

News Desk

पॉंडिचेरीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, व्ही. नारायणसामींचे सरकार बहुमत चाचणीत ठरले अपयशी

News Desk

काँग्रेस पक्ष हा केवळ तुमच्या किंवा राहुलजींच्या हातात सुरक्षित आहे, राजीव सातव यांचे सोनिया गांधींना पत्र

News Desk