HW News Marathi
Covid-19

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची आज पत्रकार परिषद

मुंबई | कोरोनामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी २० लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यानंतर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग पाच दिवस पत्रकार परिषदेद्वारे २० लाख कोटींच्या पॅकेजचा देशातील कोणत्या क्षेत्रांना कित्या क्षेत्राला आणि कोणत्या योजनांना किती पैसे दिले जाणार यांची माहिती दिली. यानंतर आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची आज (२२ मे) सकाळी १० वाजता पत्रकार परिषद होणार आहे. आरबीआय गव्हर्नर या पत्रकार परिषदेत आर्थिक पॅकेजसंदर्भात काय बोलणार याकडे सर्व देशवासियांचे लक्ष लागेल आहे.

आरबीआय गव्हर्नर यांनी दोन महिन्यांपूर्वीच दास यांनी पत्रकार परिषद तीन महिने ईएमआयन देण्याची मुभा दिली होती. यामुळे नोकरदारांना दिलासा मिळाला होता. यावेळी लॉकडाऊनमध्ये कोणाचा रोजगार बुडाला किंवा नोकरी गेली तर तो व्यक्ती घेतलेल्या कर्जाचा ईएमएय भरू शकत नव्हता, व्यक्तीला दंड आणि क्रेडिट स्कोअरवर परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर बँकांनीही या सूचनेचे पालन केले होते.

गेल्या १७ एप्रिलला कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे आरबीआयने विविध योजनांची घोषणा केली होती. यावेळी रिव्हर्स रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. आता हा रेपो रेट ४ टक्क्यांवरून ३.७५ टक्के झाला आहे. त्या आधी २७ मार्चला दास यांनी मुदतीच्या कर्जांवर ईएमआय न भरण्याची सूट दिली होती.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांच्या प्रचंड गदारोळात राज्यसभेत मोदी सरकारचे ‘शेती विधेयक’ मंजूर

News Desk

‘रेमेडेसिविर’ची निर्यात थांबवली, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

News Desk

रुग्णालय स्वच्छता,ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला निर्देश              

News Desk