HW News Marathi
Covid-19

भारतातील लॉकडाऊन इतक्यात संपण्याची घाई करु नका – रिचर्ड हॉर्टन

न्यूयॉर्क | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगात अनेक देशांत लॉकडाऊन आहे. भारतानेही ३ मेपर्यंत लॉकडाऊन जारी केला आहे. जर कोरोनाला आळा घालायचा असेल तर भारताने किमान दहा आठवड्यांचा लॉकडाऊन पाळावा, बंधने शिथिल करण्याची घाई करु नये, असा सल्ला जगातील आघाडीच्या वैद्यकीय जर्नल ‘द लान्सेट’चे मुख्य संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी दिला आहे. इंडिया टूडेने त्यांची मुलाखत घेतली होती, त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे.

‘प्रत्येक देशातील ‘कोरोना’ची साथ कायमस्वरुपी राहणार नाही. आपले देश ‘कोरोना’चा उद्रेक नियंत्रित करण्यासाठी योग्य तेच करत आहेत. भारतात जर लॉकडाऊन यशस्वी झाले, तर आपल्याला १० आठवड्यांच्या कालावधीत यामध्ये घट दिसून येईल. जर वायरस रोखता आला, तर गोष्टी सामान्य होऊ शकतात. अगदीच सामान्य नाही, आपल्याला सोशल डिस्टन्सिंग ठेवावे लागेल, मास्कही घालावे लागतील आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे लागेल’ असे मत रिचर्ड हॉर्टन यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.

‘चीनमधील ज्या वुहानपासून ‘कोरोना’ला सुरुवात झाली, तिथे २३ जानेवारीपासून एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत १० आठवड्यांसाठी अत्यंत कठोर लॉकडाऊन राबवण्यात आला. त्यामुळे कोरोनावर ते मात करु शकले. ते आता पुन्हा सामान्य जीवन जगत आहेत. खरे तर, कुठलेही ‘साथीच्या रोगाचे वैज्ञानिक मॉडेल’ हेच दर्शवतात. आपण सामाजिक अंतर न पाळल्यास मोठ्या लोकसंख्येत वेगाने पसरते’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा कृती आराखडा तयार

News Desk

इंदापूरमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची तपासणी करूनच तालुक्यात घेण्यात यावे !

News Desk

विरोधकांना कामधंदा नाहीय, जुनी गोष्ट उकरून काढतायत ! अजित पवारांची टीका

News Desk