HW News Marathi
Covid-19

विरोधकांना कामधंदा नाहीय, जुनी गोष्ट उकरून काढतायत ! अजित पवारांची टीका

मुंबई । महाराष्ट्रात सर्वात गाजलेल्या ‘पहाटेच्या शपथविधी’वरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा पेटत आहेत. विशेषतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ह्या मुद्द्यावरून चांगलीच जुंपली आहे. “अजित पवारांना फक्त सत्ता स्थापन करता येते, पण टिकवता येत नाही”, अशी टीका नुकतीच चंद्रकांत पाटलांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी आता पलटवार केला आहे. “विरोधकांना काही कामधंदा नाही. त्यामुळे ते जुनी गोष्ट उकरून काढत आहेत”, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार आज (६ जून) माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करणे, राष्ट्रवादीसोबत जाणे ही माझी चूक होती. त्यामुळे माझ्या प्रतिमेला धक्का बसला, अशी कबुली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एका मुलाखतीत दिली. त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यातील वाकयुद्ध सुरू झाले आहे. यावर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले, “आता त्या गोष्टीला १४ महिने झाले आहेत. तरीही मागची गोष्ट उकरून काढत आहेत. ज्यांना काही काम नाही ते लोकं या गोष्टीवर बोलत आहेत”, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनमध्ये दररोज दीड लाख लोकांना मिळणार ‘शिवभोजन थाळी’, छगन भुजबळांची माहिती

News Desk

देशात गेल्या २४ तासात ४९,९३१ नवे रुग्ण आढळले

News Desk

राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला तर कोरोनामुक्तांचा आकडा दुप्पट

News Desk