HW News Marathi
देश / विदेश

रोहिंग्यांच्या छावण्यांमध्ये रोज ६० बालकांचा होतो जन्म

ढाका | संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार बांगलादेशातील रोहिंग्यांच्या छावण्यांमध्ये दररोज ६० बालकांचा जन्म होत असल्याची माहिती समोर आली आहे. वर्षभरात १६ हजार बालकांचा जन्म झाला असून मे आणि जून अखेरपर्यंत आणखी २५ हजार बालके जन्माला येण्याची शक्यता आहे. गतवर्षी म्यानमार मधल्या त्रासाला कंटाळून बांगलादेशमध्ये आलेल्या रोहिंग्यांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत.

ऑगस्ट २०१७ पासून लाखांहून अधिक रोहिंग्यांनी म्यानमार सोडून बांगलादेशच्या दिशेने पलायन केले होते. या दरम्यान अनेक महिला व मुलींवर बलात्कार झाल्यामुळे त्या गर्भवती आहेत. बांगलादेशमध्ये म्यानमारहुन आल्यानंतर यांमध्ये ८१ हजार महिला गरोदर होत्या असे बांगलादेशाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्राच्यामते गरोदर महिला व मुलींची संख्या ४० हजारच्या आसपास असावी.

म्यानमारमध्ये गेल्या वर्षी रोहिंग्यांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. यामध्ये बहुतांश सर्व महिलांवर शारीरिक, मानसिक व लैंगिक अत्याचाराच्या खुणा आहेत असे मत इस्लामिक रिलिफ कॅनडा या संस्थेच्या संचालक डॉ. फारिहा खान यांनी माहिती देताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी! –  नाना पटोले

Aprna

हंदवाड्यात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक, १ जवान शहीद

News Desk

“महाराष्ट्र किती मोठा आहे ठाऊक आहे का?”, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk
राजकारण

हिंदु महासभेचा कुमार स्वामींच्या शपथविधीला विरोध

News Desk

कर्नाटक | कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे राजकीय नाट्य अद्याप सुरुच आहे. कर्नाटकात उद्या नवीन सरकार स्थापन होत असतानाच अजूनही राजकीय वादविवाद सुरुच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कुमार स्वामी यांच्या शपथविधीला हिंदु महासभेने विरोध केला असून याबाबत हिंदू महासभेने सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आहे. कुमार स्वामी यांचा शपथविधी घटनाबाह्य असून असल्याचे या याचिकेमध्ये म्हटले आहे.

कुमारस्वामी यांचा शपथविधी बुधवारी दुपारी किंवा संध्याकाळी होणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. तसेच जेडीएस व कॉंग्रेसच्या संयुक्त सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होणार असून ही दोन्ही पदे काँग्रेसला देण्याची सूचना राहुल गांधी यांनी कुमार स्वामी यांना केल्याचे समजते आहे. तसेच काँग्रेसचे आमदार आणि येडियुरप्पा यांच्या विरोधात दंड थोपटणारे डी के शिवकुमार यांनाही महत्त्वाचे मंत्रीपद देण्यात येणार आहे तर दुसरीकडे काल वीरशैव महासभेनेही कुमारस्वामी यांना एक पत्र लिहिले असून राज्याचे गृहमंत्रीपद वीरशैव समाजातील आमदारांकडे द्यावा अशीही मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

 

Related posts

प्रचारबंदीनंतर साध्वी प्रज्ञा यांनी मंदिरात जाऊन भजन गायले

News Desk

“भाजपचे सहा उमेदवार विधान परिषदेवर निवडून येणार”, चंद्रकांत पाटालांचा विश्वास

Aprna

मध्य प्रदेशात मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड, काँग्रेस नेत्यांकडून तक्रार

News Desk