HW News Marathi
देश / विदेश

देश भाजप नाही आरएसएस चालवत आहे | सावित्रीबाई फुले

लखनऊ | भारतीय जनता पार्टीमधून राजीनामा दिल्यानंतर खासदार सावित्री बाई फुले यांनी रविवारी (23 डिसेंबर) रोजी रमाबाई आंबेडकर मेळाव्याच्या जागेवरुन झालेल्या सार्वजनिक सभेत भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले की देश आरएसएस चालवत आहे. सावित्री बाई फुले म्हणाल्या की जेव्हा त्या भाजपामध्ये होत्या तेव्हा त्यांना लोकसभेत त्यांचे मत माडण्याची परवानगी नव्हती.

काही मंत्री, आमदार आणि आरएसएस प्रमुख यांच्याकडून ऐकायला मिळत आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय राज्यघटना बदलली जाणार आहे. त्या म्हणाल्या आरक्षण बंद करण्यात येणार आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर संविधानाच्या प्रती जाळण्यात आल्या. आम्ही आमचा हक्क मागणार नाही तर हिसकावुन घेणार आहोत. फुले म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही संविधान आणि आरक्षण वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. फुले म्हणाल्या, ब-याच वर्षांपासून संविधानानुसार दिलेले आरक्षण राबविण्याची मागणी मी करत आहे. त्याच वेळी त्यांनी पंतप्रधानांना पहारेकरी नाहीतर भागीदार असल्याचे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीएसआयचा गळा चिरला, बोटे कापली

News Desk

पाकिस्तानमध्ये ४० दहशतवादी संघटना सक्रिय, इम्रान खानचा गौप्यस्फोट

News Desk

मुंबईसह राज्याच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

News Desk